शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांनाे, पहिल्या टप्प्यात पाऊस कमी झाला तरी ‘नो टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 07:00 IST

Nagpur News कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.

ठळक मुद्देकपाशीला ६०० ते ७५० मिमी पावसाचीच गरजदुष्काळ सहनशील पीक

 

सुनील चरपे

नागपूर : यंदा मान्सून रेंगाळला असून, पहिल्या टप्प्यात काॅटन बेल्ट असलेल्या पूर्व विदर्भासह जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, या पिकाला सरासरी ६०० ते ७५० मिमी पावसाची गरज असल्याने पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.

कपाशीचे पीक दुष्काळ सहनशील असून, भारी व काळीच्या जमिनीत ते किमान १५ ते २० दिवस आणि हलक्या जमिनीत आठवडाभर पावसाचा खंड व पाण्याचा ताण सहन करू शकते. सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान सरासरीपेक्षा १९ टक्के कमी अथवा १९ टक्के अधिक राहिल्यास दाेन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये कपाशीचे पीक चांगले येते. परंतु, या काळात तापमान किमान १५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणे आवश्यक आहे.

पावसाचे प्रमाण यापेक्षा कमी अथवा अधिक झाल्यास पिकाचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. अधिक पाऊस झाल्यास जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याने यवतमाळ, अमरावती, अकाेला, नागपूर व जळगाव जिल्ह्यातील कपाशीसाठी धाेक्याची सूचना ठरू शकते. वर्धा जिल्ह्यातील माती वाळूयुक्त असल्याने हा जिल्हा अपवाद ठरताे, असेही यवतमाळ येथील कापूस उत्पादक शेतकरी मिलिंद दामले यांनी सांगितले.

मातीची सच्छिद्रता महत्त्वाची

पिकांची उत्तम वाढ आणि चांगल्या उत्पादनासाठी मातीची सच्छिद्रता महत्त्वाची आहे. यासाठी मातीच्या छिद्रांमध्ये ५० टक्के पाणी व ५० टक्के हवा असायला पाहिजे. पिकांची मुळे या छिद्रांमधून हवेतील ऑक्सिजन शाेषून घेत असून, काॅर्बन डायऑक्साईड हवेत साेडतात. त्यामुळे जमिनीत कार्बाेलिक ॲसिड तयार हाेऊन जमिनीतील जैविक प्रक्रिया वाढते व मुळे पाेषक अन्नद्रव्ये शाेषून घेतात. पाऊस अधिक झाल्यास ही छिद्रे पाण्यामुळे बुजतात व पिकांना हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावते. शिवाय, जमिनीत बुरशी तयार हाेते. त्याचा पिकांच्या वाढीसाेबतच उत्पादनावर विपरीत परिणाम हाेताे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयाेग्य ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. पाण्याच्या याेग्य निचऱ्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. जलसंधारणासाठी मुख्य मशागतीची कामे उताराला आडवी अथवा कंटूर रेषेला करावी.

- डाॅ. सचिन वानखेडे, विषय विशेषज्ञ,

हवामान शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र,

केंद्रीय कापूस संशाेधन संस्था, नागपूर.

 

टॅग्स :cottonकापूस