शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांनाे, पहिल्या टप्प्यात पाऊस कमी झाला तरी ‘नो टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 07:00 IST

Nagpur News कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.

ठळक मुद्देकपाशीला ६०० ते ७५० मिमी पावसाचीच गरजदुष्काळ सहनशील पीक

 

सुनील चरपे

नागपूर : यंदा मान्सून रेंगाळला असून, पहिल्या टप्प्यात काॅटन बेल्ट असलेल्या पूर्व विदर्भासह जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, या पिकाला सरासरी ६०० ते ७५० मिमी पावसाची गरज असल्याने पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली.

कपाशीचे पीक दुष्काळ सहनशील असून, भारी व काळीच्या जमिनीत ते किमान १५ ते २० दिवस आणि हलक्या जमिनीत आठवडाभर पावसाचा खंड व पाण्याचा ताण सहन करू शकते. सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान सरासरीपेक्षा १९ टक्के कमी अथवा १९ टक्के अधिक राहिल्यास दाेन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये कपाशीचे पीक चांगले येते. परंतु, या काळात तापमान किमान १५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणे आवश्यक आहे.

पावसाचे प्रमाण यापेक्षा कमी अथवा अधिक झाल्यास पिकाचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. अधिक पाऊस झाल्यास जमिनीत पाण्याचा याेग्य निचरा हाेत नसल्याने यवतमाळ, अमरावती, अकाेला, नागपूर व जळगाव जिल्ह्यातील कपाशीसाठी धाेक्याची सूचना ठरू शकते. वर्धा जिल्ह्यातील माती वाळूयुक्त असल्याने हा जिल्हा अपवाद ठरताे, असेही यवतमाळ येथील कापूस उत्पादक शेतकरी मिलिंद दामले यांनी सांगितले.

मातीची सच्छिद्रता महत्त्वाची

पिकांची उत्तम वाढ आणि चांगल्या उत्पादनासाठी मातीची सच्छिद्रता महत्त्वाची आहे. यासाठी मातीच्या छिद्रांमध्ये ५० टक्के पाणी व ५० टक्के हवा असायला पाहिजे. पिकांची मुळे या छिद्रांमधून हवेतील ऑक्सिजन शाेषून घेत असून, काॅर्बन डायऑक्साईड हवेत साेडतात. त्यामुळे जमिनीत कार्बाेलिक ॲसिड तयार हाेऊन जमिनीतील जैविक प्रक्रिया वाढते व मुळे पाेषक अन्नद्रव्ये शाेषून घेतात. पाऊस अधिक झाल्यास ही छिद्रे पाण्यामुळे बुजतात व पिकांना हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावते. शिवाय, जमिनीत बुरशी तयार हाेते. त्याचा पिकांच्या वाढीसाेबतच उत्पादनावर विपरीत परिणाम हाेताे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयाेग्य ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. पाण्याच्या याेग्य निचऱ्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. जलसंधारणासाठी मुख्य मशागतीची कामे उताराला आडवी अथवा कंटूर रेषेला करावी.

- डाॅ. सचिन वानखेडे, विषय विशेषज्ञ,

हवामान शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र,

केंद्रीय कापूस संशाेधन संस्था, नागपूर.

 

टॅग्स :cottonकापूस