शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीकडे वळली भीमपाखरांची पाऊले; कार्यक्रम नसला तरी ओढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 21:19 IST

Nagpur News नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे.

ठळक मुद्देअनुयायांच्या आगमनाने फुलू लागला परिसर

नागपूर : काेराेनाचे सावट कायम आहे, मुख्य साेहळा हाेणार नसल्याची घाेषणा झाली, शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या, काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे. एवढेच नाही तर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवेश नाकारला गेला आहे. अशा परिस्थितीत नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे. (The footsteps of pilgrims turned towards Deekshabhoomi; Even if there is no event, the attraction remains)

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टाेबर १९५६ राेजी रक्ताचा थेंबही न सांडविता ऐतिहासिक क्रांती केली. आपल्या काेट्यवधी शाेषित पीडित समाजाला तथागत गाैतम बुद्ध यांचा प्रकाशमय धम्म दिला आणि नवा जन्म व्हावा तसा या समाजाच्या आयुष्यात परिवर्तन घडले. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यावर्षी ६५ वा वर्धापन दिन आहे. मागील दाेन वर्षापासून साऱ्या जगावर काेराेना महामारीचे सावट पसरले हाेते. साऱ्या प्राण्यांना बंदी बनविणारा माणूस पहिल्यांदा बंदिस्त झाला. सर्वत्र टाळे लागले असताना दीक्षाभूमीचे द्वारही बंद झाले हाेते. मागील वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या परिसरात शुकशुकाट पसरला हाेता. त्यानंतरही कुठलाच कार्यक्रम हाेऊ शकला नाही. भीम अनुयायांना बाहेरूनच अभिवादन करतानाचे दृश्य अनुभवले आहे.

आता सार निस्तरायला लागलं आहे आणि येथे येऊन बाबासाहेबांना, तथागत बुद्धाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचे प्राण कंठाशी आले आहेत. मात्र महामारीचे सावट कायम असल्यामुळे प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य साेहळा रद्द केला. मात्र आतमध्ये अभिवादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रम नसला तरी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावून पुन्हा नवी ऊर्जा घेण्याचा उत्साह अनुयायांमध्ये संचारला आहे. त्यामुळे बुधवारपासूनच देशभरातील लाेक जत्थ्याने दीक्षाभूमीकडे पाेहचायला लागली आहेत. बाैद्ध भिक्खू, पाठीवर बॅग लावलेले तरुण आणि डाेक्यावर भाकरीचे गाठाेडे घेतलेली माणसे ओढेने येऊ लागली आहेत. या भूमीतून पुस्तकांचे गाठाेडे आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी ती आली आहेत आणि दाेन वर्षाच्या सुनेपणानंतर पुन्हा क्रांतिभूमीचा परिसर फुलला आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

दीक्षाभूमीवर गर्दी हाेणार नाही यासाठी प्रशासन त्यांच्याकडून प्रयत्न करीत आहे. तसे आवाहन करण्यात आले. मात्र अनुयायांचे आगमन हाेणारच, ही शक्यता जाणून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीही प्रशासन सज्ज आहे. पाेलीस विभागाने आपली जबाबदारी स्वीकारली असताना मनपा व जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययाेजना केली जात आहे. दीक्षाभूमीच्या चारही गेटकडे बॅरिकेड लावण्यात आले आहेत. दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी