शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

दीक्षाभूमीकडे वळली भीमपाखरांची पाऊले; कार्यक्रम नसला तरी ओढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 21:19 IST

Nagpur News नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे.

ठळक मुद्देअनुयायांच्या आगमनाने फुलू लागला परिसर

नागपूर : काेराेनाचे सावट कायम आहे, मुख्य साेहळा हाेणार नसल्याची घाेषणा झाली, शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या, काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे. एवढेच नाही तर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवेश नाकारला गेला आहे. अशा परिस्थितीत नियमांचा सन्मान राखत आणि सर्व अडचणी पार करीत भीम अनुयायांचे जथ्ये दीक्षाभूमीकडे वळू लागली असून हा परिसर पुन्हा निळ्या पाखरांनी फुलू लागला आहे. (The footsteps of pilgrims turned towards Deekshabhoomi; Even if there is no event, the attraction remains)

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टाेबर १९५६ राेजी रक्ताचा थेंबही न सांडविता ऐतिहासिक क्रांती केली. आपल्या काेट्यवधी शाेषित पीडित समाजाला तथागत गाैतम बुद्ध यांचा प्रकाशमय धम्म दिला आणि नवा जन्म व्हावा तसा या समाजाच्या आयुष्यात परिवर्तन घडले. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यावर्षी ६५ वा वर्धापन दिन आहे. मागील दाेन वर्षापासून साऱ्या जगावर काेराेना महामारीचे सावट पसरले हाेते. साऱ्या प्राण्यांना बंदी बनविणारा माणूस पहिल्यांदा बंदिस्त झाला. सर्वत्र टाळे लागले असताना दीक्षाभूमीचे द्वारही बंद झाले हाेते. मागील वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या परिसरात शुकशुकाट पसरला हाेता. त्यानंतरही कुठलाच कार्यक्रम हाेऊ शकला नाही. भीम अनुयायांना बाहेरूनच अभिवादन करतानाचे दृश्य अनुभवले आहे.

आता सार निस्तरायला लागलं आहे आणि येथे येऊन बाबासाहेबांना, तथागत बुद्धाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचे प्राण कंठाशी आले आहेत. मात्र महामारीचे सावट कायम असल्यामुळे प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य साेहळा रद्द केला. मात्र आतमध्ये अभिवादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रम नसला तरी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावून पुन्हा नवी ऊर्जा घेण्याचा उत्साह अनुयायांमध्ये संचारला आहे. त्यामुळे बुधवारपासूनच देशभरातील लाेक जत्थ्याने दीक्षाभूमीकडे पाेहचायला लागली आहेत. बाैद्ध भिक्खू, पाठीवर बॅग लावलेले तरुण आणि डाेक्यावर भाकरीचे गाठाेडे घेतलेली माणसे ओढेने येऊ लागली आहेत. या भूमीतून पुस्तकांचे गाठाेडे आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी ती आली आहेत आणि दाेन वर्षाच्या सुनेपणानंतर पुन्हा क्रांतिभूमीचा परिसर फुलला आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज

दीक्षाभूमीवर गर्दी हाेणार नाही यासाठी प्रशासन त्यांच्याकडून प्रयत्न करीत आहे. तसे आवाहन करण्यात आले. मात्र अनुयायांचे आगमन हाेणारच, ही शक्यता जाणून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीही प्रशासन सज्ज आहे. पाेलीस विभागाने आपली जबाबदारी स्वीकारली असताना मनपा व जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययाेजना केली जात आहे. दीक्षाभूमीच्या चारही गेटकडे बॅरिकेड लावण्यात आले आहेत. दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी