शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

पोलिसांची फूलप्रूफ प्लॅनिंग : अपघात आणि गुन्हे मुक्त राहिले नागपूर शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:07 IST

होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही.

ठळक मुद्देहोळीनिमित्त विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. तसेच वाहतुक पोलिसांनी राज्यात सर्वात मोठी मोहीम राबवित दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांसह हैदोस घालणाऱ्यांना थंड केले. त्यामुळे या होळीमुळे अपघात आणि गुन्हे घडले नाही, हे विशेष!होळीच्या दिवशी नेहमीच गुन्हेगार आपले जुने वाद उकरून काढतात. त्यामुळे खून, मारहाणीच्या घटना घडत असतात. यासाठी पोलिसांनी यंदा विशेष उपाययोजना केल्या होत्या. पोलिसांनी काही गुन्हेगार आणि उपद्रव करणाऱ्यांना अगोदरच तुरुंगात पाठवले होेते. जे यातून वाचले त्यांना शहराबाहेर पाठवण्यात आले. होळीत दुसरी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अपघात होय. याचे मुख्य कारण दारू पिऊन वाहन चालवणे आणि वाहन चालवताना गोंधळ घालणे होय. यासाठी वाहतूक विभागाचे डीसीपी विक्रम साळी यांनी व्यापक बंदोबस्त केला होता. जागोजागी बॅरिकेट्स लावून वाहन चालकांना रोखले जात होते. ब्रीथ अ‍ॅनलायजरने त्यांची तपासणी केली जात होती. अपघात मुक्त शहर ठेवण्याची मुख्य संकल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची होती. ती काटोकोरपणे राबवण्यात आली. स्वत: पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय हे देखरेख करीत होते. या फुलप्रूफ बंदोबस्तामुळे शहरात अपघात व गुन्हेगारीच्या घटनांवर पूर्ण नियंत्रण ठेवता आले. याचे चांगले परिणाम दिसून आले.नागरिकांच्या मदतीमुळेच शक्यसराईत गुन्हेगार आणि होळीत गडबड करू शकतील, अशा गुन्हेगारांविरुद्ध अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. संवेदनशील पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे उपद्रवी लोकांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. हे सर्व नागरिकांमुळेच शक्य झाले. नागरिकांच्या मदतीमुळेच नागपूर पोलीस प्रत्येक मोर्चावर यशस्वी ठरले. नागपूरकर विपरीत परिस्थितीतही संयम आणि शांतीने राहतात. नागपूर पोलिसांसाठीसुद्धा ही अभिमानाची बाब आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय,पोलीस आयुक्त, नागपूर शहर

टॅग्स :HoliहोळीNagpur Policeनागपूर पोलीस