शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कामगारांना पाच रुपयात सकस आहार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 21:49 IST

बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देअटल आहार योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, पशु व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, लघु व मध्यम उद्योगाचे अध्यक्ष संदीप जोशी, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार आयुक्त राजीव जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे सचिव श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त विजय पानबुडे, समन्वयक दिनेश ठाकरे, सहायक कामगार आयुक्त लोया आणि मडावी उपस्थित होते.कामगार कल्याणचा निर्णय १० वर्षांपूर्वी झाला. परंतु २०१४ पर्यंत केवळ एक लाख कामगारांचीच नोंदणी झाली. गेल्या दोन वर्षात आम्ही तब्बल १० लाख कामगारांची नोंदणी केली. केवळ नोंदणीच केली नाही तर त्यांच्यासाठी विविध योजनाही केल्या. शिक्षण, आरोग्यापासून तर त्यांच्या घरासाठीही योजना राबविली जात आहे. २५ लाख कामगारांची नोंदणी करणार असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना राबविल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.यावेळी बांधकाम कामगारांना शैक्षणिक साहाय्य, वैद्यकीय साहाय्य, अवजार खरेदी साहाय्य असे विविध लाभ देण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्यात आले. विदर्भ पोलीसपाटील संघटनेतर्फे मानधनवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनेने आभार मानले. नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत विजेत्या संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अटल आहार योजनेची आहारकिट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी मंडळाच्या कार्याचा धावता आढावा घेतला.मजुरांना कामाच्या ठिकाणी मिळणार आहारकामगार आयुक्त राजीव जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकेत अटल आहार योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बांधकाम मजुरांसह एकूणच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच रुपयात जेवणाचा डबा उपलब्ध होईल. यासाठी प्रत्येक कामगाराला एक स्मार्ट कार्ड मिळेल, ते दाखविले की भोजन मिळेल. कामगारांच्या कामाच्या शिफ्टप्रमाणे ते उपलब्ध होईल, यासाठी गाड्यांमध्ये विशिष्ट प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या मजुरांच्या कामावर जाऊन त्यांना भोजन उपलब्ध करून देतील. सध्या तीन संस्थांकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ३२ विविध योजनाही राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात १०० पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहयावेळी राज्यभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यभरात १०० सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार असून, यापैकी ६१ सभागृहांची प्रशासकीय मान्यता झाली आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीतून या सभागृहांची निर्मिती राज्यभरात होणार आहे.नागपुरात कामगार भवन, १० कोटी रुपये मंजूरनागपुरात कामगार भवन उभारण्यात येणार असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीfoodअन्न