शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजनातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:35 IST

तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

ठळक मुद्देनागपुर रेल्वेस्थानकावर उपचार : अधिकाऱ्यांनी घेतले भोजनाचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.रेल्वेगाडी क्रमांक १२५१२ तिरुअनंतपुरम-गोरखपूरमधील एस २, एस ३, एस७, एस १० आणि एस ११ कोचमधील प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जोलारपेट्टई येथे पेंट्रीकारमधून अंडा बिरयानी विकत घेतली. रात्री १२ नंतर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना पोटदुखी, उलटी,अतिसाराचा त्रास सुरु झाला. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत तक्रार केली. परंतु मार्गात कुठेही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर गाडीतील टीटीईने नागपूर विभागातील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लगेच रेल्वे रुग्णालयाचे प्लॅटफार्मवर हजर झाले. राप्तीसागर एक्स्प्रेस सायंकाळी ५.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचार केला. या गाडीतील एस २ कोचच्या ४८ क्रमांकाच्या बर्थवरील प्रवासी भुषण रामछेद चौहान (४२) याने रात्री जेवन केल्यानंतर पोट दुखणे सुरु झाल्याचे सांगितले. तर मो. युनुस (१९) या प्रवाशाने भोजन केल्यानंतर उलटी, डोकेदुखीचा त्रास झाल्याची माहिती दिली. यावेळी रेल्वे रुग्णालयाचे डॉ. प्रसन्न फटींग, डॉ. हरीश भुक्या, स्टेशन संचालक दिनेश नागदिवे, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, राजु इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे, आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त दिपकसिंग चौहान, निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद शेख उपस्थित होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पेंट्रीकारमधील अन्नाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले असून या नमुन्यांची तपासणी केल्यावर अन्न दुषित आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. रुग्णांवर उपचार केल्यानंतर सायंकाळी ५.५५ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

टॅग्स :railwayरेल्वेfood poisoningअन्नातून विषबाधा