शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजनातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:35 IST

तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

ठळक मुद्देनागपुर रेल्वेस्थानकावर उपचार : अधिकाऱ्यांनी घेतले भोजनाचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिरुअनंतपुरमवरून गोरखपूरकडे जात असलेल्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांना भोजन केल्यानंतर पोटदुखी, उलटी, अतिसाराचा त्रास सुरु झाला. मार्गात अनेकदा तक्रार करूनही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर नागपुर रेल्वेस्थानकावर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना रेल्वे डॉक्टरांनी उपचार पुरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.रेल्वेगाडी क्रमांक १२५१२ तिरुअनंतपुरम-गोरखपूरमधील एस २, एस ३, एस७, एस १० आणि एस ११ कोचमधील प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जोलारपेट्टई येथे पेंट्रीकारमधून अंडा बिरयानी विकत घेतली. रात्री १२ नंतर या गाडीतील २० ते २५ प्रवाशांना पोटदुखी, उलटी,अतिसाराचा त्रास सुरु झाला. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत तक्रार केली. परंतु मार्गात कुठेही त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही. अखेर गाडीतील टीटीईने नागपूर विभागातील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. लगेच रेल्वे रुग्णालयाचे प्लॅटफार्मवर हजर झाले. राप्तीसागर एक्स्प्रेस सायंकाळी ५.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचार केला. या गाडीतील एस २ कोचच्या ४८ क्रमांकाच्या बर्थवरील प्रवासी भुषण रामछेद चौहान (४२) याने रात्री जेवन केल्यानंतर पोट दुखणे सुरु झाल्याचे सांगितले. तर मो. युनुस (१९) या प्रवाशाने भोजन केल्यानंतर उलटी, डोकेदुखीचा त्रास झाल्याची माहिती दिली. यावेळी रेल्वे रुग्णालयाचे डॉ. प्रसन्न फटींग, डॉ. हरीश भुक्या, स्टेशन संचालक दिनेश नागदिवे, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, राजु इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे, आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त दिपकसिंग चौहान, निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद शेख उपस्थित होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पेंट्रीकारमधील अन्नाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले असून या नमुन्यांची तपासणी केल्यावर अन्न दुषित आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. रुग्णांवर उपचार केल्यानंतर सायंकाळी ५.५५ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

टॅग्स :railwayरेल्वेfood poisoningअन्नातून विषबाधा