शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:33 IST

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.

ठळक मुद्देनिवडणूक यंत्रणा व पोलिसांमध्ये समन्वय ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.बचतभवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विधानसभानिहाय निवडणूक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी अतिरिक्तजिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपायुक्त निर्मला देवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, राहुल माकणीकर, विक्रम साळी, विवेक मसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे, श्रीकांत उंबरकर, डॉ. शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, श्याम मदनूरकर, अतुल म्हेत्रे, हिरामण झिरवाळ, शेखर घाडगे, शीतल देशमुख, सुजाता गंधे उपस्थित होते.निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार काम करताना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सतत वरिष्ठांच्या संपर्कात राहून, अडचण असेल तिथे मार्गदर्शन घ्यावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान संवेदनशील आणि दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीन आणि तहसील कार्यालय परिसरात तीन अशी एकखिडकीच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रेही त्या-त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. यावेळी ग्रामीण मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रे स्विकारताना पोलीस उपविभागीय अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून त्या ठिकाणी उमेदवारासोबत फक्त तीन वाहनांनाच परवानगी द्यावी. त्यामुळे परिसरात गर्दी होणार नाही आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.शहरातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारासंघातील उमेदवार कदाचित एकाच दिवशी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची शक्यता लक्षात घेता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने १०० मीटरपरिसरात वाहनांची गर्दी होणार नाही, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या.निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्यानिवडणूक प्रक्रियेदरम्यान उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधीत मतदारसंघातील पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी भेट घेऊन समन्वय साधावा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास वरिष्ठांना अवगत करावे. निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय