शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:22 IST

वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून मानधन थकलेसरकारने केले हात वर वृद्धापकाळातील आधाराला खीळ

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करण्यात आणि जतन करून ठेवण्यात खºया अर्थाने या राज्यातील लोककलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावण्या, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांनी या कलांना वाढविले आणि पुरोगामी चळवळीला जिवंत ठेवले. उमेदीचा काळ त्यांनी या सेवेत वाहिला. त्यांच्या उदरभरणाचे साधनही हेच होते. बहुतेक कलावंत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असल्याने रोजमजुरी व कामधंदा मिळणे कठीण असते. अशात समाज व कुटुंबाकडून होणारी उपेक्षा व शासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे वृद्धावस्थेत त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नियमानुसार २०१७-१८ साली ६० कलावंतांची यादी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला पाठविली व ती मंजूरही करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या निवड झालेल्या कलावंतांचे मानधन जमा झाले नाही. एवढेच नाही तर २०१५-१६ पासूनच कलावंतांच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्याची माहिती निवड झालेल्या कलावंतांनी लोकमतला दिली आहे. यानुसार गेल्या तीन वर्षापासून हे सर्व लोककलावंत मानधनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेले लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. निवड समितीचे सदस्य दयाल कांबळे यांनी सांगितले, थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला वारंवार विचारणा केली आहे. मात्र शासनाकडून पैसा न आल्याची सबब त्यांच्याकडून दिली जाते. दुसरीकडे सांस्कृतिक संचालनालयालाही याबाबत निवेदन सादर केले असता त्यांच्याद्वारे पैसा नसल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला ‘अ’ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे.राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमाह मानधन देण्याची योजना आहे. नागपूर जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी ४०० ते ५०० कलावंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. मात्र शासन निर्णयानुसार त्यातील केवळ ६० कलावंतांची निवड केली जाते. ते तुटपुंजे असले तरी औषधपाणी व इतर खर्च निघून जातो. मात्र हेच मानधन थकीत झाल्याने या वृद्ध कलावंतांना अगतिकता सहन करावी लागत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

समिती सदस्यांचा बैठक भत्ताही थकला२०१५-१६ पासून मानधन निवड समितीच्या सदस्यांचा बैठक भत्ताही थकित असल्याची माहिती समिती सदस्य दयाल कांबळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या बांधकाम, कृषी, समाज कल्याण आदी समित्यांप्रमाणे लोककलावंतांच्याही समितीला प्रवास भत्ता व बैठक भत्ता लागू आहे. मात्र सदस्यांना आजपर्यंत त्याचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार