शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

लोककलावंतांचा मानच, ‘धन’ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:22 IST

वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापासून मानधन थकलेसरकारने केले हात वर वृद्धापकाळातील आधाराला खीळ

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. २०१७-१८ मध्ये नव्याने मंजूर झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसह आधीच्या कलावंतांनाही गेल्या तीन वर्षापासून वृद्धापकाळ मानधन मिळाले नसल्याने अभावग्रस्त वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करण्यात आणि जतन करून ठेवण्यात खºया अर्थाने या राज्यातील लोककलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. या कलावंतांनी आपले सबंध आयुष्य लोककलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालविले. संगीत तमाशा, शाहिरी पोवाडे, लावण्या, प्रबोधनकार, देवीचा जागर, गोंधळ, डायका, भारुड, नकलाकार, भजन मंडळ, कीर्तनकार, गीत गायक, नृत्य करणारे व विविध वाद्य वाजविण्यात निपुण कलावंत व साहित्यिकांनी या कलांना वाढविले आणि पुरोगामी चळवळीला जिवंत ठेवले. उमेदीचा काळ त्यांनी या सेवेत वाहिला. त्यांच्या उदरभरणाचे साधनही हेच होते. बहुतेक कलावंत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असल्याने रोजमजुरी व कामधंदा मिळणे कठीण असते. अशात समाज व कुटुंबाकडून होणारी उपेक्षा व शासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे वृद्धावस्थेत त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागते.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नियमानुसार २०१७-१८ साली ६० कलावंतांची यादी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला पाठविली व ती मंजूरही करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या निवड झालेल्या कलावंतांचे मानधन जमा झाले नाही. एवढेच नाही तर २०१५-१६ पासूनच कलावंतांच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्याची माहिती निवड झालेल्या कलावंतांनी लोकमतला दिली आहे. यानुसार गेल्या तीन वर्षापासून हे सर्व लोककलावंत मानधनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षाला मानधनासाठी आलेले लोककलावंतांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. निवड समितीचे सदस्य दयाल कांबळे यांनी सांगितले, थकीत मानधनासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला वारंवार विचारणा केली आहे. मात्र शासनाकडून पैसा न आल्याची सबब त्यांच्याकडून दिली जाते. दुसरीकडे सांस्कृतिक संचालनालयालाही याबाबत निवेदन सादर केले असता त्यांच्याद्वारे पैसा नसल्याचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेंतर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या कलावंताला ‘अ’ दर्जा देऊन २१०० रुपये मानधन आहे.राज्य व जिल्हा पातळीवरील ब व क विभागाच्या कलावंतांना अनुक्रमे १८०० व १५०० रुपये दरमाह मानधन देण्याची योजना आहे. नागपूर जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी ४०० ते ५०० कलावंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात. मात्र शासन निर्णयानुसार त्यातील केवळ ६० कलावंतांची निवड केली जाते. ते तुटपुंजे असले तरी औषधपाणी व इतर खर्च निघून जातो. मात्र हेच मानधन थकीत झाल्याने या वृद्ध कलावंतांना अगतिकता सहन करावी लागत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

समिती सदस्यांचा बैठक भत्ताही थकला२०१५-१६ पासून मानधन निवड समितीच्या सदस्यांचा बैठक भत्ताही थकित असल्याची माहिती समिती सदस्य दयाल कांबळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या बांधकाम, कृषी, समाज कल्याण आदी समित्यांप्रमाणे लोककलावंतांच्याही समितीला प्रवास भत्ता व बैठक भत्ता लागू आहे. मात्र सदस्यांना आजपर्यंत त्याचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार