शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पारडीतील निर्माणाधीन उड्डाणपूल ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:52 IST

पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर पसरली माती : पावसात अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.पारडी चौकात २४ तास जड वाहनांची वर्दळ असते. पारडी उड्डाणपुलाचे व सोबत मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे या रस्त्याने वाहन चालकांसह पायी जाणाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. दर दिवशी अपघात होत असतात. लोकमतने येथील समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.या ठिकाणी सुरक्षा मानकाकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. हनुमान मंदिरसमोरच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचा उतार आहे. तेथील रस्ता सहा महिन्यापासून खोदून तसाच सोडलेला आहे. यात आतापर्यंत सहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. १२० मीटर रुंद असलेल्या पारडी चौकाची ओळखच बनलेली आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढिगारे, गिट्टी, अर्धवट अवस्थेतील पिल्लर अशी अवस्था आहे. गेल्या सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु आतापर्यंत केवळ ४० टक्केच काम झाले आहे. भंडारा रोड जिथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून येथून ये-जा करावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यापर्यंत सर्वच बंद असल्याने नागरिकांना त्रास झाला नाही. परंतु आता सर्व व्यवहार सुरू असल्याने आणि पावसाळा वाढल्याने अडचणी जास्त वाढल्या आहेत. अपघाताचा धोका वाढला आहे.पावसाळ्याने वाढला त्रासपारडी येथील प्रेमचंद मेश्राम यांनी सांगितले की, निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे मोठा त्रास आहे. यात पावसाळा सुरू झाल्याने हा त्रास आणखीनच वाढला आहे. या जागेतून वाहन घेऊन जाणे मोठ्या जिकिरीचे आहे. थोडेही लक्ष विचलित झाले की, अपघात झालाच म्हणून समजा. या उड्डाणपुलाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहे. पारडी चौकातून जात असलेल्या नेताजीनगर येथील रामेश्वर शुक्ला यांनी सांगितले की, १२० मीटर रुंद असलेल्या या चौकाची आता ओळखच संपली आहे. रस्त्यावर माती व गिट्टी जमा झाल्याने दुचाकी वाहन चालकांसाठी येथून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी