शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:38 IST

यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे‘एमपीसीबी’ची हायकोर्टात माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.यासंदर्भात देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ‘एमपीसीबी’ने ही शास्त्रीय बाजू स्पष्ट केली. त्यानंतर राज्य सरकारने उपाययोजनांची माहिती दिली. फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण आढळून आलेल्या दोन बोअरवेलवर लाल खूण करण्यात आली आहे. त्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरू नये अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच, संबंधित नागरिकांना पाईप लाईनद्वारे पिण्यायोग्य पाणी पुरविले जात आहे असे सरकारने सांगितले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी आठ आठवडे तहकूब केली.यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ५०० लोकवस्त्यांमध्ये नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. हाडे ठिसुळ होणे, दात खराब होणे, किडनीचे आजार इत्यादी आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाने फ्लोराईडयुक्त पाणी धोकादायक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अभ्यासाचा उल्लेख होता. भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १४ जणांचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWaterपाणीYavatmalयवतमाळ