शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:38 IST

यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे‘एमपीसीबी’ची हायकोर्टात माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.यासंदर्भात देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ‘एमपीसीबी’ने ही शास्त्रीय बाजू स्पष्ट केली. त्यानंतर राज्य सरकारने उपाययोजनांची माहिती दिली. फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण आढळून आलेल्या दोन बोअरवेलवर लाल खूण करण्यात आली आहे. त्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरू नये अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच, संबंधित नागरिकांना पाईप लाईनद्वारे पिण्यायोग्य पाणी पुरविले जात आहे असे सरकारने सांगितले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी आठ आठवडे तहकूब केली.यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ५०० लोकवस्त्यांमध्ये नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. हाडे ठिसुळ होणे, दात खराब होणे, किडनीचे आजार इत्यादी आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाने फ्लोराईडयुक्त पाणी धोकादायक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अभ्यासाचा उल्लेख होता. भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १४ जणांचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWaterपाणीYavatmalयवतमाळ