शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:07 IST

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. नदी-नाले दुथडी वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. गडचिराेली जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून ४० गावांना पुराचा वेढा पडला आहे. वर्धा जिल्ह्यातील २५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थिती नाजूक आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याला जाेडणारे बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत. भंडारा आणि यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. साेबतच नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेघे वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह गवसला. त्यासाेबतच जांब (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा (ता. मूल) येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमूर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही-वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंद पडला.

भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला. १० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. नदी-नाल्यांना पूर आला असून अड्याळ-विरली, सोनेगाव ते विरली आणि भावड ते तेलोदा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे २५० वर घर आणि गोठ्यांची पडझड झाली.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

भंडारा, गडचिरोलीतील शाळांना ३ दिवस सुटी

पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी गडचिराेली आणि भंडारा जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. गडचिराेलीत मागील आठवड्यात सुरुवातीला ३ दिवस, त्यानंतर ३ दिवस अशी आठवडाभर सुटी जाहीर करण्यात आली हाेती. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाेबतच गडचिराेली जिल्ह्यातील खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाशिममध्ये जिल्ह्यातील शाळा १८ जुलै आणि १९ जुलै हे दोन दिवस बंद ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरRainपाऊसVidarbhaविदर्भ