शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:07 IST

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. नदी-नाले दुथडी वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. गडचिराेली जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून ४० गावांना पुराचा वेढा पडला आहे. वर्धा जिल्ह्यातील २५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थिती नाजूक आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याला जाेडणारे बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत. भंडारा आणि यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. साेबतच नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेघे वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह गवसला. त्यासाेबतच जांब (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा (ता. मूल) येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमूर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही-वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंद पडला.

भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला. १० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. नदी-नाल्यांना पूर आला असून अड्याळ-विरली, सोनेगाव ते विरली आणि भावड ते तेलोदा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे २५० वर घर आणि गोठ्यांची पडझड झाली.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

भंडारा, गडचिरोलीतील शाळांना ३ दिवस सुटी

पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी गडचिराेली आणि भंडारा जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. गडचिराेलीत मागील आठवड्यात सुरुवातीला ३ दिवस, त्यानंतर ३ दिवस अशी आठवडाभर सुटी जाहीर करण्यात आली हाेती. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाेबतच गडचिराेली जिल्ह्यातील खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाशिममध्ये जिल्ह्यातील शाळा १८ जुलै आणि १९ जुलै हे दोन दिवस बंद ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरRainपाऊसVidarbhaविदर्भ