शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:07 IST

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. नदी-नाले दुथडी वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. गडचिराेली जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून ४० गावांना पुराचा वेढा पडला आहे. वर्धा जिल्ह्यातील २५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थिती नाजूक आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याला जाेडणारे बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत. भंडारा आणि यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. साेबतच नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेघे वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह गवसला. त्यासाेबतच जांब (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा (ता. मूल) येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमूर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही-वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंद पडला.

भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला. १० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. नदी-नाल्यांना पूर आला असून अड्याळ-विरली, सोनेगाव ते विरली आणि भावड ते तेलोदा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे २५० वर घर आणि गोठ्यांची पडझड झाली.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

भंडारा, गडचिरोलीतील शाळांना ३ दिवस सुटी

पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी गडचिराेली आणि भंडारा जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. गडचिराेलीत मागील आठवड्यात सुरुवातीला ३ दिवस, त्यानंतर ३ दिवस अशी आठवडाभर सुटी जाहीर करण्यात आली हाेती. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाेबतच गडचिराेली जिल्ह्यातील खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाशिममध्ये जिल्ह्यातील शाळा १८ जुलै आणि १९ जुलै हे दोन दिवस बंद ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरRainपाऊसVidarbhaविदर्भ