शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

विदर्भात महापुराचा प्रकाेप, अनेक गावं पाण्याखाली; चौघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:07 IST

गडचिरोलीतील तब्बल ४० गावांना पुराचा वेढा, चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील गावे पुराच्या सावटात

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून विदर्भात सर्वत्र संततधार पावसामुळे दयनीय स्थिती झालेली आहे. नदी-नाले दुथडी वाहत असून पुराचे पाणी अनेक गावांत शिरले आहे. गडचिराेली जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून ४० गावांना पुराचा वेढा पडला आहे. वर्धा जिल्ह्यातील २५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून स्थिती नाजूक आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्याला जाेडणारे बहुतांश मार्ग बंद झालेले आहेत. भंडारा आणि यवतमाळमध्ये नाल्याच्या पुरात विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. साेबतच नागपूर जिल्ह्यात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेघे वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह गवसला. त्यासाेबतच जांब (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील मातीच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा (ता. मूल) येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. २४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमूर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही-वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंद पडला.

भंडारा जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गत २४ तासात ६१.२ मिमी पाऊस कोसळला. १० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनी तालुक्यातील आसगाव येथे शिकवणी वर्गासाठी जाणारा १० वर्षीय विद्यार्थी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. नदी-नाल्यांना पूर आला असून अड्याळ-विरली, सोनेगाव ते विरली आणि भावड ते तेलोदा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. जिल्ह्यात २४ तासांत ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे २५० वर घर आणि गोठ्यांची पडझड झाली.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे. तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

भंडारा, गडचिरोलीतील शाळांना ३ दिवस सुटी

पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी गडचिराेली आणि भंडारा जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. गडचिराेलीत मागील आठवड्यात सुरुवातीला ३ दिवस, त्यानंतर ३ दिवस अशी आठवडाभर सुटी जाहीर करण्यात आली हाेती. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाेबतच गडचिराेली जिल्ह्यातील खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. वाशिममध्ये जिल्ह्यातील शाळा १८ जुलै आणि १९ जुलै हे दोन दिवस बंद ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरRainपाऊसVidarbhaविदर्भ