शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:55 IST

गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

ठळक मुद्देमर्यादित संख्येमुळे उड्डाणांवर परिणाम : प्रवाशांची अपुरी संख्या मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.नागपुरातून एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या उड्डाणांचे संचालन व्हायचे. एअर इंडियाचे नागपूर ते दिल्लीदरम्यान आठवड्यात तीन दिवस उड्डाणे होती. तर इंडिगो दिल्ली, कोलकाताद्वारे पुणेकरिता उड्डाणांचे संचालन करीत होती. गेल्या आठवड्यापर्यंत इंडिगोचे नागपूरहून मुंबईदरम्यान उड्डाणे उपलब्ध होती. आता कोणतेही उड्डाण न राहिल्याने उपराजधानीचा राज्याच्या राजधानीसोबत हवाई मार्गाने कनेक्शन थांबले आहे. गो एअर एअरलाईन्स नागपूरहून अहमदाबाद व मुंबईकरिता विमानांचे संचालन करीत होती. पण दोन आठवड्यापासून कंपनीच्या विमानाचे कोणतेही संचालन झालेले नाही. नागपूरहून मुंबईकडे विमानांच्या उड्डाणांचे संचालन होत नसल्याच्या कारणांवर एअरलाईन्सने मौन साधले आहे.एका विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने कोणत्याही विमान कंपन्यांची २५ येण्याचे आणि २५ जाण्याचे असे एकूण ५० उड्डाणे निर्धारित केल्याने नागपूर-मुंबई-मुंबईचे आॅपरेशन सध्या थांबविण्यात आले आहे. विमान कंपन्या नागपूरला जास्त महत्त्व देत नसल्याचे यावरून सिद्ध होते. अन्यथा कंपन्या मर्यादित उड्डाणांच्या संख्येत नागपूर-मुंबईचा समावेश करू शकली असती. महामारीमुळे विमानाचा लोड फॅक्टरमुळे कंपन्या आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या पद्धतीने बदल करीत आहे. जास्त उड्डाणाच्या मार्गाला प्राधान्य देत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर