शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 15, 2024 22:48 IST

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही.

नागपूर : एअर इंडियाचे मुंबई-नागपूर ६२९ विमानाचे उड्डाण अनेक दिवसांपासून वेळेवर होत नाही. मुंबई विमानतळावर विमानांची प्रचंड वाहतूक असल्याने या उड्डाणाच्या वेळेला प्राधान्य दिले जात नाही. शनिवारी विमानाला उशीर झाल्यामुळे या विमानातील प्रवाशांनी मुंबई विमानतळावर गोंधळ घातला होता.

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही. सोमवारीही या विमानाबाबत असेच घडले. रात्री ८ च्या सुमारास विमानाचा वैमानिक उपलब्ध नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या उड्डाणासाठी उपलब्ध वैमानिक राजकोटहून येईल, असे सांगितले, पण ‘टेक ऑफ’ची कोणतीही स्पष्ट वेळ दिली नाही. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावेळी त्यांना तांत्रिक कारण सांगण्यात आले.

माहितीनुसार, हे विमान मुंबईहून सायंकाळी ७.२० वाजता सुटते आणि रात्री ८.५५ वाजता नागपुरात पोहोचते. या विमानाचे शेवटचे तिकिट १८ ते २० हजार रुपयांत देण्यात आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत या विमानाने प्रवास करणे सर्वच दृष्टिकोनातून महागडे आहे. एआय-६२९ या विमानासाठी दोन ते चार तासांचा विलंब आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. नागपूरचे प्रवासी मुंबईत विमानात बसण्यासाठी थांबले होते. ते म्हणाले, लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वजण विमानाच्या प्रतीक्षेत होते. विमान कंपनीने प्रवाशांना विलंबाचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही, कोणताही संदेश किंवा संवाद साधण्यास रस दाखवला नाही. तसेच चहा आणि नाश्तादेखील दिला नाही.

गेट बदलत राहिले प्रवासीप्रारंभी एआय ६२९ या विमानाच्या प्रवाशांसाठी गेट क्रमांक ४९ए निश्चित करण्यात आला होता. नंतर त्यांना गेट क्रमांक ४२बी आणि काही वेळाने गेट क्रमांक ४१ए देण्यात आला. अशा परिस्थितीत प्रवासी इकडून तिकडे भटकत राहिले. या विमानाने नागपुरात येण्याची वाट पाहणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियातून मुंबईत पोहोचलेले एक कुटुंब चार तास विमानतळावर थांबले होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया