शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 15, 2024 22:48 IST

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही.

नागपूर : एअर इंडियाचे मुंबई-नागपूर ६२९ विमानाचे उड्डाण अनेक दिवसांपासून वेळेवर होत नाही. मुंबई विमानतळावर विमानांची प्रचंड वाहतूक असल्याने या उड्डाणाच्या वेळेला प्राधान्य दिले जात नाही. शनिवारी विमानाला उशीर झाल्यामुळे या विमानातील प्रवाशांनी मुंबई विमानतळावर गोंधळ घातला होता.

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही. सोमवारीही या विमानाबाबत असेच घडले. रात्री ८ च्या सुमारास विमानाचा वैमानिक उपलब्ध नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या उड्डाणासाठी उपलब्ध वैमानिक राजकोटहून येईल, असे सांगितले, पण ‘टेक ऑफ’ची कोणतीही स्पष्ट वेळ दिली नाही. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावेळी त्यांना तांत्रिक कारण सांगण्यात आले.

माहितीनुसार, हे विमान मुंबईहून सायंकाळी ७.२० वाजता सुटते आणि रात्री ८.५५ वाजता नागपुरात पोहोचते. या विमानाचे शेवटचे तिकिट १८ ते २० हजार रुपयांत देण्यात आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत या विमानाने प्रवास करणे सर्वच दृष्टिकोनातून महागडे आहे. एआय-६२९ या विमानासाठी दोन ते चार तासांचा विलंब आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. नागपूरचे प्रवासी मुंबईत विमानात बसण्यासाठी थांबले होते. ते म्हणाले, लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वजण विमानाच्या प्रतीक्षेत होते. विमान कंपनीने प्रवाशांना विलंबाचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही, कोणताही संदेश किंवा संवाद साधण्यास रस दाखवला नाही. तसेच चहा आणि नाश्तादेखील दिला नाही.

गेट बदलत राहिले प्रवासीप्रारंभी एआय ६२९ या विमानाच्या प्रवाशांसाठी गेट क्रमांक ४९ए निश्चित करण्यात आला होता. नंतर त्यांना गेट क्रमांक ४२बी आणि काही वेळाने गेट क्रमांक ४१ए देण्यात आला. अशा परिस्थितीत प्रवासी इकडून तिकडे भटकत राहिले. या विमानाने नागपुरात येण्याची वाट पाहणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियातून मुंबईत पोहोचलेले एक कुटुंब चार तास विमानतळावर थांबले होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया