शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

मुंबई विमानतळावर नागपुरातील प्रवाशांचे हाल; एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाकडे दुर्लक्ष

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 15, 2024 22:48 IST

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही.

नागपूर : एअर इंडियाचे मुंबई-नागपूर ६२९ विमानाचे उड्डाण अनेक दिवसांपासून वेळेवर होत नाही. मुंबई विमानतळावर विमानांची प्रचंड वाहतूक असल्याने या उड्डाणाच्या वेळेला प्राधान्य दिले जात नाही. शनिवारी विमानाला उशीर झाल्यामुळे या विमानातील प्रवाशांनी मुंबई विमानतळावर गोंधळ घातला होता.

वक्तशीरपणाच्या अभावामुळे अनेकदा क्रू सदस्यांना नियमानुसार मुदत संपल्यानंतर ड्युटी करता येत नाही. सोमवारीही या विमानाबाबत असेच घडले. रात्री ८ च्या सुमारास विमानाचा वैमानिक उपलब्ध नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या उड्डाणासाठी उपलब्ध वैमानिक राजकोटहून येईल, असे सांगितले, पण ‘टेक ऑफ’ची कोणतीही स्पष्ट वेळ दिली नाही. उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यावेळी त्यांना तांत्रिक कारण सांगण्यात आले.

माहितीनुसार, हे विमान मुंबईहून सायंकाळी ७.२० वाजता सुटते आणि रात्री ८.५५ वाजता नागपुरात पोहोचते. या विमानाचे शेवटचे तिकिट १८ ते २० हजार रुपयांत देण्यात आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत या विमानाने प्रवास करणे सर्वच दृष्टिकोनातून महागडे आहे. एआय-६२९ या विमानासाठी दोन ते चार तासांचा विलंब आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. नागपूरचे प्रवासी मुंबईत विमानात बसण्यासाठी थांबले होते. ते म्हणाले, लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वजण विमानाच्या प्रतीक्षेत होते. विमान कंपनीने प्रवाशांना विलंबाचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही, कोणताही संदेश किंवा संवाद साधण्यास रस दाखवला नाही. तसेच चहा आणि नाश्तादेखील दिला नाही.

गेट बदलत राहिले प्रवासीप्रारंभी एआय ६२९ या विमानाच्या प्रवाशांसाठी गेट क्रमांक ४९ए निश्चित करण्यात आला होता. नंतर त्यांना गेट क्रमांक ४२बी आणि काही वेळाने गेट क्रमांक ४१ए देण्यात आला. अशा परिस्थितीत प्रवासी इकडून तिकडे भटकत राहिले. या विमानाने नागपुरात येण्याची वाट पाहणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियातून मुंबईत पोहोचलेले एक कुटुंब चार तास विमानतळावर थांबले होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया