शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

पाच वर्षांनंतर विदर्भाला मिळाला विशेष निधी, पण तोही अर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:31 IST

काँग्रेससारखाच भाजपा सरकारनेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेष निधी जाहीर केला. मात्र यावर्षी १०० कोटीच्या जागी फक्त ५० कोटी रुपये देण्यात आले.

ठळक मुद्दे५० कोटी मंजूर२०१४ मध्ये मिळाले होते १०० कोटी

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ विकास मंडळामार्फत विदर्भाला देण्यात येणाऱ्या विशेष निधीची आठवण पाच वर्षानंतर राज्य सरकारला आली. काँग्रेससारखाच भाजपा सरकारनेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेष निधी जाहीर केला. मात्र यावर्षी १०० कोटीच्या जागी फक्त ५० कोटी रुपये देण्यात आले.विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्देशावर महाराष्ट्राच्या सर्व भागात एकसारखा विकास करण्यासाठी तीन विकास मंडळाचे गठन करण्यात आले. राज्यात विदर्भाबरोबरच मराठवाडा व शेष महाराष्ट्र, असे तीन मंडळ आहेत. आता या मंडळाचा वैधानिक दर्जा काढून घेतला आहे. असे असतानाही हे तीनही मंडळ आपापल्या भागात विकासाचे अध्ययन व संशोधनाची जबाबदारी पार पाडत आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात तीनही मंडळाला १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मिळत होता. पण सरकारने त्याला ब्रेक लावला होता. मात्र २०१४ च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विदर्भ विकास मंडळाला १०० कोटी रुपये देण्यात आले होते. पण भाजपाच्या नेतृत्वात बनलेल्या सरकारने हा निधी बंद केला, कारण दिले की मंडळाचे काम विकासाचे नाही तर अध्ययन करण्याचे आहे. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या वर्षी सरकारने भाजपाचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष बनविले. अन्य मंडळांनाही पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले. या अध्यक्षांच्या दबावात राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद केली. परंतु सरकारने अर्धाच निधी मंडळाला दिला.

केवळ मानव विकासावर होणार खर्चराज्य सरकारने निधीची तरतूद करताना काही अटीसुद्धा घातल्या आहे. निवडण्यात आलेल्या तालुक्यात मंडळ केवळ मानव विकास कार्यक्रमावरच पैसे खर्च करू शकेल. या अतंर्गत आरोग्य, शिक्षण व प्रति व्यक्ती उत्पन्नावर जोर देण्यात येईल. कुठल्याही एका ठिकाणी अडीच कोटी रुपयांच्या वर पैसे खर्च करता येणार नाही. अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यायामशाळा आदी कामांसाठी निधी देण्यात येणार नाही. हा निधी खर्च करताना महिला बचत गट व कृषी उत्पादन संस्था यांच्यामार्फत खर्च करण्याची अट घातली आहे.

मंडळाला केवळ अध्ययनापुरते सीमित ठेवामंडळाचे सदस्य विशेष निधीच्या संदर्भात काहीच बोलायला तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, मंडळाला विकास निधीच्या भानगडीतून दूर ठेवणे योग्य राहील, मंडळ सदस्यांनी ही मागणी पहिलेच केली होती. निधीचे वाटप बंदही झाले होते. मात्र राजकीय नियुक्तीनंतर पुन्हा निधीचे वाटप झाले. मंडळ केवळ अध्ययनाच्या कामातच व्यस्त राहावे.केवळ अर्ध्या तालुक्यांना लाभराज्य सरकारकडून मिळालेल्या विशेष निधीतून मंडळ केवळ ६० तालुक्यात खर्च करू शकेल. विदर्भात एकूण १२० तालुके आहेत. यातील ६४ अमरावती विभागात आहेत. नागपूर विभागात ५६ तालुके आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व सावनेर हे तालुके निधीपासून वंचित राहू शकतात. त्याचबरोबर बुलडाणा येथील ७, अकोला १, अमरावती २, यवतमाळ ७, भंडारा ५, गोंदिया ८, चंद्रपूर व गडचिरोलीतील ११ तालुक्यांना लाभ मिळेल.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ