शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

अस्थमाच्या बाल रुग्णांमध्ये दरवर्षी पाच टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:14 IST

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देअकॅडमी ऑफ पेडियाट्रिक : श्वसन विकारावर कार्यशाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अकॅडमी ऑफ पेडियाट्रिकच्या (एओपी) पदधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.याप्रसंगी ‘एओपी’चे अध्यक्ष डॉ. रवी भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. शिल्पा हजारे उपस्थित होत्या.डॉ. भेलोंडे म्हणाले, दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढते प्रदूषण, दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे त्रास होऊ शकतोग्रामीणपेक्षा शहरात धोका अधिकडॉ. तुराळे म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक आहे. वाढते शहरीकरण, गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.बदललेली आहारपद्धती हे एक कारणडॉ. हजारे म्हणाल्या, बदललेली आहारपद्धती हे सुद्धा दमा होण्यास प्रमुख कारणे मानले जाते. पिज्झा, बर्गर, फास्ट फूड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेये आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत ठरते.दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्णडॉ. भेलोंडे म्हणाले, दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण आढळून येतात. क्षयरोगात न्युमोनियामुळे होणाºया मृत्यूचे दुसरे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे, ‘मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी’ (एमडीआर) ७० ते ८० हजार नवे रुग्णही दरवर्षी सामोर येत आहे. यात साधारण ८ टक्के लहान मुले असतात.नागपुरात डायरियाचे ५० टक्के रुग्णसध्या नागपुरात ‘व्हायरल’चा प्रकोप सुरू असलातरी ५० टक्के रुग्ण हे ‘डायरिया’चे आहे. दूषित पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार होतो. या शिवाय, अ‍ॅलर्जी अस्थमा, डेंग्यूचे रुग्णही दिसून येऊ लागले आहेत.‘पल्मोनोलॉजी’वर कार्यशाळा‘एओपी’च्यावतीने २८ जुलै रोजी ‘आयएमए’ सभागृहात ‘पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी’वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. एस.के. काबरा, डॉ. एस. नागभूषण व डॉ. उपेंद्र किंजवाडेकर उपस्थित राहतील.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर