शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीचे १२ तासात पाच बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 10:19 IST

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही.

ठळक मुद्देचार निराधार वृद्धांनी सोडले उघड्यावर जीव पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनांची नोंद अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली, तर रविवारी सकाळी ताजबाग परिसरात एका वृद्धाचा मृतदेह आढळला.शनिवारी पहाटे एमआयडीसीतील तकियावाले बाबा दर्ग्याजवळ सुमारे ८० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास कळमन्यातील विद्यार्थी वसतिगृहाजवळ एक ६० वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला. दुपारी ४ च्या सुमारास मेयोतील आकस्मिक तपासणी कक्षाजवळ एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर अजनी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयाजवळ ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. हे चारही वृद्ध निराधार आणि अनोळखी आहेत. ते उघड्यावरच राहून मिळेल ते खात होते. हक्काचा निवारा नसल्याने आणि आप्तस्वकीय काळजी घ्यायला जवळ नसल्याने कडाक्याच्या थंडीत ते रात्र काढायचे. गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याने या चारही जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी नारायण महादेवराव जगराळे (वय ६३) हे रविवारी सकाळी लहान ताजबाग परिसरात मृतावस्थेत आढळून आले. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी तसेच सक्करदरा पोलिसांनी हे कडाक्याच्या थंडीचे बळी आहेत की नाही, ते स्पष्ट केले नाही. त्यांची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू