शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

By निशांत वानखेडे | Updated: April 19, 2023 20:13 IST

नागपूर जिल्ह्यात अवकाळीच्या वादळाचा कहर : शहरातही पडझड

नागपूर: मंगळवारी दिवसा उन्हाचा ताप दिल्यानंतर रात्री अवकाळीच्या वादळाने जिल्ह्यात काही ठिकाणी कहर केला. भिवापूर तालुक्यातील नांद (सुकळी) या गावी शिवारात विज पडल्याने गाेठ्याला आग लागल्याने पाच बैल आणि वासरू जळून खाक झाले. याच तालुक्यात वादळामुळे आंब्याच्या बागाही झडल्या. दरम्यान शहरातही मध्यरात्रीच्या वादळामुळे झाडांच्या फांद्या व बॅनर उन्मळून पडल्याची माहिती आहे.

मध्यरात्रीच्या सूमारास अचानक वादळाचा तडाखा व विजांचे गर्जन सुरू झाले. यामुळे विद्युतही खंडित झाली. यातच प्रचंड गर्जनासह विज या गाेठ्यावर काेसळली आणि गाेठ्याला आग लागली. गाेठ्यातील वैरण आणि इतर साहित्यानी पेट घेतला. अशात गाेठ्याची छत बैलांच्या अंगावर पडली व या आगीत पाच बैल व वासराचा जागीच हाेरपळून मृत्यू झाला. हा गाेठा बंदिस्त असल्याने जनावरांना बाहेर पळता आले नसल्याचे बाेलले जात आहे. एक बैल व गाय बाहेर पडले पण तेही हाेरपळले असून त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारासह सरपंच यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वादळामुळे आंब्याची बाग झळली

याच तालुक्यात भगवानपूर परिसरात झालेल्या वादळामुळे आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले. भगवानपूरला डॉ. नामदेव राऊत यांची सहा एकरांत आंब्यांची बाग आहे. तसेच बांधावरसुद्धा शेतकऱ्यांनी आंबालागवड केली आहे. त्यांचेही वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पारा ४२ अंशावरढगांच्या गर्दीने अवकाळीचे वातावरण असतानाही पाऱ्याने बुधवारी उसळी घेतली. आदल्या दिवशी ४१.२ अंशावर असलेले नागपूरचे तापमान बुधवारी ४२ अंशावर पाेहचले. मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाचे तीव्र चटके जाणवत नसले तरी उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले आहे. या सिजनमधले हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. विदर्भातही बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४२ अंशावर आहे. ब्रम्हपुरीत तब्बल ४३.८ अंशाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे.

टॅग्स :nagpurनागपूर