शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:54 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार संस्थांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ दाखविली. त्यामुळे २०१८ पासून तलावांवर पूर्णत: मासेमारी बंद असून, मासेमारांचा रोजगारदेखील बुडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार संस्थांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ दाखविली. त्यामुळे २०१८ पासून तलावांवर पूर्णत: मासेमारी बंद असून, मासेमारांचा रोजगारदेखील बुडाला आहे. मासेमारांना परवडेल असे दर निश्चित करून तलावांची लिलाव प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मासेमारी संस्थांनी केली आहे.मत्स्य व्यवसाय विभागाने शासननिर्णय काढून तलावाच्या लीजचा दर १८०० रुपये हेक्टर ठरविला होता. १८०० रुपये दराला न्यायालयातही आव्हान देण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या तलावांना हा शासन निर्णय लागू पडत नाही, असे परिपत्रक पशू, दुग्ध व मत्स्य विभागाच्या सचिवांनी काढले. या प्रकियेत २ वर्षे लोटून गेले. मासेमारी संस्थांच्या मते दोन वर्षांपासून जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने तलावांचा लिलाव केलेला नाही. त्यामुळे मच्छीमार संस्थांच्या सभासदांचा मागील दोन वर्षापासून रोजगार हिरावला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा महसूल बुडाला आहे. जिल्हा परिषदेने २०१८ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासननिर्णयानुसार लघुसिंचन विभागाच्या तलावांची लिलाव प्रक्रिया केली होती. मात्र १८०० रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दर निश्चित केल्याने लिलाव प्रक्रियेत मच्छीमार संस्थांनी भाग घेतला नाही. लघुसिंचन विभागाचे तलाव बारामाही जलसाठा नसणारे तलाव असून, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून कोरडे पडतात. त्यामुळे या तलावात मत्स्य संचयन व संवर्धन करणे संस्थांना परवडत नाही. त्यामुळे १८०० रुपये हेक्टर दर हा मासेमारांना परवडणारा दर नाही. शासनाने जिल्हा परिषदेच्या तलावांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केल्यानंतरही जिल्हा परिषदेने तलावांचे लिलाव केले नाहीत. त्यामुळे योग्य तो दर निश्चित करून तलावांचा लिलाव लवकरात लवकर करावा. जेणेकरून मासेमार संस्थांच्या सभासदांना रोजगार उपलब्ध होईल.पुरुषोत्तम बोबडे, अध्यक्षग्रामहित मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या.सर्वसाधारण सभेची प्रतीक्षाशासनाकडून तलावांच्या लिलावाचे दर निश्चित झाले नाहीत. शासनाने सांगितले की जिल्हा परिषद स्वायत्त संस्था आहे. तुम्हीच दर निश्चित करून लिलाव करा. त्यानुसार ४५० रुपये हेक्टर बुडीत क्षेत्राचा दर निश्चित केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यात दर निश्चित झाल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.बंडू सयाम, जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुसिंचन विभाग, जि.प.

टॅग्स :fishermanमच्छीमारNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर