शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:01 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून पुढे आली आहे. ‘नीरी’ने याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देनीरीचा अहवाल : पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून पुढे आली आहे. ‘नीरी’ने याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.मागील काही दिवसापासून अंबाझरी तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. मेलेले मासे तलावातील पाण्यात तरंगत असल्याने तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. नीरीलाही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. नीरीच्या तज्ज्ञांनी तलावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यात बॅक्टेरिया वाढला असून तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सोपविण्यात आला आहे. उद्यान विभागाकडून हा अहवाल जलप्रदाय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. याचा माशांवर परिणाम होत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तलावातील मासे जिवंत राहण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज आहे. यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षशहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावाचे संवर्धन व देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तलावातील मासे मृत्युमुखी पडत असल्यासंदर्भात नागरिकांनी आधीच कल्पना दिली होती. तलावाच्या काठावर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचलेली आहे. यामुळेही पाणी प्रदूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तातडीने उपाययोजनांची गरजअंबाझरी तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून बॅक्टेरिया वाढल्याने तलावातील जलचर प्राण्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता महापालिका प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

उद्योगाचे दूषित पाणी तलावातउद्योगांतील रासायनिक पाणी व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. यामुळे अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू होत आहे. जलाशयातील प्रदूषण न रोखल्यास तेथील जैवविविधतेवर परिणाम होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविणारमासे मृत्युमुखी पडत असल्याने अंबाझरी तलावाच्या विविध भागातील पाण्याच्या नमुन्यांची नीरीने तपासणी केली. यात तलावातील काही भागातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याचे आढळून आले आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात अंबाझरी तलावातील माशांचा यापूर्वीही मृत्यू झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसात तापमानामुळे तलावातील पाण्याच्या वरच्या थरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा, पाण्याचे प्रदूषण रोखून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना महापालिका हाती घेणार आहे.अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूर