शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नरभक्षी वाघिणीने केली पहिली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:42 IST

नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली.

ठळक मुद्देपुसागोंदीत वासराला केले लक्ष्य : स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स तैनात, नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढाळी : नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली. नरभक्षी वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडल्यानंतरची शिकारीची ही पहिली घटना आहे. आधीच नरभक्षी वाघिणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना वासराच्या शिकारीमुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासही नागरिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. त्यात ही घटना घडली. दरम्यान, वाघिणीच्या संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वन विभागाचे ४० जवान कावडीमेट परिसरात दाखल झालेले आहेत.ब्रह्मपुरी परिसरात धुमाकूळ घालून अनेक नागरिकांवर हल्ला करून त्यांना ठार करणाºया नरभक्षी वाघिणीला अलीकडे बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या वाघिणीने सुरुवातीला अडेगाव परिसरात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे या परिसरातील अडेगाव, कवडस, गोठणगाव, देवळी, पेंढरी, खापा बोरी, गिदमगड, काजळी, धोकुर्डा, बारंगा, सावळी (बिबी), चौकी, डेगमा, माथनी, नवेगाव, वानरविहिरा आदी गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नरभक्षी वाघिण बोरमध्ये सोडण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. दरम्यान मंगळवारी (दि. ८) या नरभक्षी वाघिणीने अडेगाव जंगलालगत एका शेतात ठिय्या मांडला. या परिसरातील शेतात कामाला जाणाºया मजुरांना ही वाघिण दिसताच त्यांनी पळ काढला. बराच वेळ ती वाघिण एकाच जागेवर बसून होती.आलेसूरमध्ये पुन्हा एका गाईची शिकारनांद : आलेसूर शिवारात आणखी एका गाईवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. हा प्रकार गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. आठवडाभरात वाघाने चार गार्इंची शिकार केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सूर्यभान खाटे, रा. आलेसूर असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे. गुराखी रमेश गुळधे हा गुरुवारी सकाळच्या सुमारास गाई चराईसाठी घेऊन गेला होता. गावातील शाळेलगत तो गाई चारत असताना वाघाने एका गाईवर हल्ला केला. हा प्रकार लक्षात येताच त्याने आरडाओरड केली, नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघ जंगलात पळून गेला तर गाईचा मृत्यू झाला होता. याबाबत वन कर्मचाºयाला सूचना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.चार दिवसांपूर्वी वाघाने तीन जनावरांवर हल्ला करून ठार केले. आता पुन्हा त्यात एकाची भर पडली.शेतात एकटे जाऊ नयेसध्या शेतीची कामे सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना शेत कामासाठी शेतात जावेच लागते. त्यातच वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करीत असल्याने रखवालीसाठीसुद्धा शेतकºयांना जावे लागते. मात्र ही नरभक्षी वाघिण येताच शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दुसरीकडे वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आली असून कावडीमेट, किनकीडोडा गावातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. ही वाघिण काही दिवस परिसरात थांबून बोर व्याघ्र प्रकल्पात निघून जाईल. त्यामुळे शेतकºयांनी सध्यातरी एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. या वाघिणीने याच भागात आणखी काही दिवस मुक्काम केला तर तो चिंतेचा विषय होईल. त्यानंतर बेशुद्ध करून त्या वाघिणीला पकडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे वन विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले.