शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नरभक्षी वाघिणीने केली पहिली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:42 IST

नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली.

ठळक मुद्देपुसागोंदीत वासराला केले लक्ष्य : स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स तैनात, नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढाळी : नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली. नरभक्षी वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडल्यानंतरची शिकारीची ही पहिली घटना आहे. आधीच नरभक्षी वाघिणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना वासराच्या शिकारीमुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासही नागरिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. त्यात ही घटना घडली. दरम्यान, वाघिणीच्या संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वन विभागाचे ४० जवान कावडीमेट परिसरात दाखल झालेले आहेत.ब्रह्मपुरी परिसरात धुमाकूळ घालून अनेक नागरिकांवर हल्ला करून त्यांना ठार करणाºया नरभक्षी वाघिणीला अलीकडे बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या वाघिणीने सुरुवातीला अडेगाव परिसरात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे या परिसरातील अडेगाव, कवडस, गोठणगाव, देवळी, पेंढरी, खापा बोरी, गिदमगड, काजळी, धोकुर्डा, बारंगा, सावळी (बिबी), चौकी, डेगमा, माथनी, नवेगाव, वानरविहिरा आदी गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नरभक्षी वाघिण बोरमध्ये सोडण्यास नागरिकांनी विरोध केला होता. त्यानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. दरम्यान मंगळवारी (दि. ८) या नरभक्षी वाघिणीने अडेगाव जंगलालगत एका शेतात ठिय्या मांडला. या परिसरातील शेतात कामाला जाणाºया मजुरांना ही वाघिण दिसताच त्यांनी पळ काढला. बराच वेळ ती वाघिण एकाच जागेवर बसून होती.आलेसूरमध्ये पुन्हा एका गाईची शिकारनांद : आलेसूर शिवारात आणखी एका गाईवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. हा प्रकार गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. आठवडाभरात वाघाने चार गार्इंची शिकार केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सूर्यभान खाटे, रा. आलेसूर असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे. गुराखी रमेश गुळधे हा गुरुवारी सकाळच्या सुमारास गाई चराईसाठी घेऊन गेला होता. गावातील शाळेलगत तो गाई चारत असताना वाघाने एका गाईवर हल्ला केला. हा प्रकार लक्षात येताच त्याने आरडाओरड केली, नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघ जंगलात पळून गेला तर गाईचा मृत्यू झाला होता. याबाबत वन कर्मचाºयाला सूचना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला.चार दिवसांपूर्वी वाघाने तीन जनावरांवर हल्ला करून ठार केले. आता पुन्हा त्यात एकाची भर पडली.शेतात एकटे जाऊ नयेसध्या शेतीची कामे सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना शेत कामासाठी शेतात जावेच लागते. त्यातच वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी पिकांचे नुकसान करीत असल्याने रखवालीसाठीसुद्धा शेतकºयांना जावे लागते. मात्र ही नरभक्षी वाघिण येताच शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दुसरीकडे वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आली असून कावडीमेट, किनकीडोडा गावातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. ही वाघिण काही दिवस परिसरात थांबून बोर व्याघ्र प्रकल्पात निघून जाईल. त्यामुळे शेतकºयांनी सध्यातरी एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. या वाघिणीने याच भागात आणखी काही दिवस मुक्काम केला तर तो चिंतेचा विषय होईल. त्यानंतर बेशुद्ध करून त्या वाघिणीला पकडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे वन विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले.