शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जैव इंधनावर धावणार नागपूर-रायपूर पहिली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 16:25 IST

नागपुरात प्रदुषणमुक्त भारतातील पहिली एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) बस बनविण्यात आली आहे. तर बायो-सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टरही लॉन्च करण्यात आला.

नागपूर : जैव इंधनावर वाहने चालविण्याचा प्रयोग झाला असून एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे. ही बस काही दिवसातच नागपूर ते रायपूर दरम्यान धावणार आहे. भंडारा  व रायपूरमध्ये एलएनजी स्टेशन उभारून मध्यभारतात एलएनजीची उपलब्धता कमालीची वाढणार आहे. 

इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी ३ ठिकाणी बायो एलएनजी स्टेशन उभारण्यात येणार असून यामुळे वायु प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजनच्या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या बसबाबत नागरिकांमध्ये कमालीचे कुतुहल असून ही बस आकर्षणाचा विषय ठरली आहे.

बायो एलएनजी म्हणजेच जैव इंधन निर्मिती कृषी कचरा, सेंद्रीय कचरा, उद्योगांमधील कचा, घरामधून निघणारा कचरा यापासून निर्माण केले जाते. याचा वापर डिझेल वाहनांमध्ये केल्यास प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास मदत होणार आहे. या जैव इंधनावर वाहने चालविण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला असून आयएसओ मानक १५५०० या अंतर्गत डिझेलवर चालणारी बस पूर्णपणे जैव इंधनावर चालविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 

सामंजस्य करारांतर्गत भंडारा जिल्ह्यातील मासळ येथे जैवइंधन केंद्र उभारले जाणार आहे. याशिवाय नागपूर व रायपूर येथेही अशा केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. सोबतच, नागपूर व रायपूरदरम्यान पहिली जैवइंधनावर चालणारी बससेवा प्रायोगिक तत्वावर लवकरच सुरू केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहने जैवइंधावर चालविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा मानस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणPublic Transportसार्वजनिक वाहतूक