शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कही खुशी कही गम : बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 22:18 IST

First day of the lockdown, Nagpur news नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आठवडाभर लॉकडाऊन लावला. या वेळचा लॉकडाऊन हा अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. परंतु अनेक गोष्टी सुरु असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आठवडाभर लॉकडाऊन लावला. या वेळचा लॉकडाऊन हा अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. परंतु अनेक गोष्टी सुरु असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. बंदमुळे काहींचा व्यवसाय बुडत आहे तर काहींचा सुरू असल्याने हाताला काम मिळत आहे. त्यामुळे सोमवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागपुरात कही खुशी कही गम दिसून आले.

सोमवारपासून शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाले आहे. २१ मार्चपर्यंत चालणाऱ्या या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला असून असेच सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासह कामठी, हिंगणा, सोनेगाव, कोरोडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्येही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान लोकांची गर्दीही दिसून आली. त्यांचे म्हणणे होते की, उद्योग-कार्यालये सुरु असल्याने त्यांना घराबाहेर निघावेच लागेल. असे असले तरी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असलेल्या बाजारपेठा बंद होत्या. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, दारुची दुकाने, रेस्टारंट, हॉटेल, सिनेमागृह आदी बंद असल्यामुळे शहरतील गर्दीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले. यासोबतच आजपासून बँकांचाही संप होता. त्यामुळे शहरातील गर्दीवर चांगलेच नियंत्रण आले.

जागोजागी पोलीस पण सौजन्याची वागणूक

लॉकडाऊन दरम्यान शहरात जागोजागी पोलीस तैनात होते. तब्बल १०७ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. परंतु यावेळी कुणावरही सक्ती करण्यात येत नव्हती. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली, अनेकांचे चालानही कापले. मात्र नागरिकांना त्रास दिला नाही. एकूणच पोलिसांकडून सौजन्याची वागणूक नागरिकांना मिळाली. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने पोलिसांना उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. मागणी केल्यास ओळखपत्र दाखवावे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय शहरात येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही केले आहे.

असा राहिला लॉकडाऊन

- भाजीपाला मुबलक, पण भाव गडगडले

- मध्यप्रदेश छत्तीसगडचे मजूर आपापल्या गावी परतले

- कळमना बाजारात पहिल्याच दिवशी ८५ टक्के गर्दी ओसरली

- गिट्टीखदानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केला विरोध

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर