शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:53 AM

एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.

ठळक मुद्देकला विभागात टॉपर पाखीची यशोगाथा

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.पाखीने मिळविलेले यश संकटाशी झुंजणाऱ्या योद्ध्याप्रमाणे आहे. पाखी अभ्यासात अत्यंत हुशार व दहाव्या वर्गात ९८.८ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पाखीच्या गुणवत्तेची चाहूल लागली होती. तेवढ्याच आत्मविश्वासाने विज्ञान विभागात प्रवेश घेतला. अकरावीनंतर बारावी सुरू झाली. यावेळी दहावीपेक्षा अधिक यश मिळविण्याची जिद्द तिने बाळगली होती. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. एक जीवघेणे संकट तिच्यावर ओढवले. एका भीषण अपघातात मेंदूला जबर मार लागला आणि ती थेट मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेली. वडील अरुणीकुमार मोर हे उद्योजक, त्यामुळे लाडक्या मुलीच्या उपचारात त्यांनी सर्वस्व झोकून दिले. डॉक्टरांनी मात्र नकारात्मकता दर्शविल्याने आईवडील थोड खचले, पण अखेरपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही, हा त्यांचा निर्धार. नागपूरनंतर मुंबईला उपचार सुरू केला. त्यांच्या विश्वासाला यश आले आणि सहा महिने कोमात राहिलेली पाखी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. पण उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी ठरला होता व त्यात वाचाही गेली होती. डॉक्टरांनी तिला घरी नेण्यास सांगितले. हा वेळ त्यांच्यासाठी कठीण होता. पुढचे काही महिने वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरत आईवडिलांनी पाखीला या जीवघेण्या अवस्थेतून बाहेर काढले. नवजात बालक जसे बोबडे बोलतात आणि पाय अडखळत चालतात, तसा पाखीचा नवा जन्म झाला होता.तिने विज्ञान सोडून हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमासह बारावी कला विभागात प्रवेश केला. मुलगी शक्य होईल तशी कॉलेजमध्ये येऊन अभ्यास करावी, रमावी ही आईवडिलांची जिद्द. तीही एखाद्या फायटरप्रमाणे झुंजायला सज्ज होती.शिक्षकांनी व मित्रांनीही तिच्या या अवस्थेत मोलाची साथ दिली. तिची झुंज, आत्मविश्वास आणि गुणवत्ता, आईवडिलांचा विश्वास यामुळे यश तिच्या पायाजवळ चालून आले. वर्षभरापूर्वी आयुष्याशी संघर्ष करणारी पाखी कला विभागात टॉपर ठरली. आजही तिचा उजवा भाग कमकुवत आहे, ती आधार घेऊन अडखळत चालते, संघर्ष करीतच बोलते व हातात पेनही घेता येत नाही. काहींना तिचा नवा जन्म आणि हे यश चमत्काराप्रमाणे वाटते. पण यामागे होता आईवडिलांचा विश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि पाखीने बाळगलेली ‘फिरूनी नवे जन्मेन मी...’ ही जिद्द.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालartकला