शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कळमना मार्केटमधील धान्याच्या गोदामाला लागली भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:02 IST

येथील कळमना मार्केट परिसरात असलेल्या एका वेअरहाऊसला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्दे६० हजार क्विंटल धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी२० गाड्या पाणी फवारले उष्णतेमुळे गोदामाची भिंत अन् स्लॅबही कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  कळमन्यातील एका चार माळ्याच्या गोदामाला शनिवारी पहाटे भीषण आग लागून सुमारे ६० हजार क्विंटल धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण आगीमुळे तीव्र उष्णता निर्माण झाल्याने गोदामाची एका बाजूची भिंत आणि स्लॅब खाली कोसळली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ अधिकारी आणि ३० जवान घटनास्थळी धावले. गेल्या १२ तासांपासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आलेले नाही. सुदैवाने आगीमुळे कुणालाही दुखापत झालेली नाही.कळमना मार्केटच्या मागे, कामठी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ कॅलिप्सो अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नामक हे वेअर हाऊस (गोदाम) आहे. प्रारंभी अफजलभाई नामक व्यक्तीने तेथे कोल्ड स्टोरेज उघडले होते. त्याच्याकडून ते दुसऱ्याने विकत घेऊन त्याचे हिमालय कोल्ड स्टोरेज असे नाव ठेवले. तेथे वारंवार छोट्यामोठ्या दुर्घटना होत असल्याने अग्निशमन दल तसेच संबंधीत विभागाने कारवाई केली होती. दोन वर्षांपूर्वी वीज आणि पाणी पुरवठा बंदची नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे स्टोरेज मालकाने सुधारणेच्या अटी मान्य करून तशी हमी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात दिली होती. दरम्यानच्या कालावधीत हे कोल्ड स्टोरेज बंद पडले अन् नंतर दक्षिणेतील रामन्नाराव बोला नामक व्यक्तीने ते विकत घेतले. त्याने कोल्ड स्टोरेज बंद करून तेथे कॅलिप्सो अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने गोदाम सुरू केले.शनिवारी पहाटेच्या ३ च्या सुमारास गोदामातून धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडताना पाहून तेथील चौकीदाराने मालकाला, पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तेथे धावले. तोपर्यंत आगीने रौद्र रुप घेतले होते. आग विझविण्यासाठी अडचण येत असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साह्याने एका भिंतीला छिद्र पाडून आतमध्ये पाण्याचा मारा केला.गोदामाची पडझड सुरूउप मुख्य अग्निशमन अधिकारी, बी. पी. चंदनखेडे आणि त्यांचे ३० सहकारी १० बंबाच्या साह्याने आग विझविण्याचे १२ तासांपासून अविश्रांत प्रयत्न करीत होते. मात्र, आग विझण्याऐवजी वाढतच होती. त्यामुळे भिंत आणि स्लॅबमधील लोखंड वितळून पडझड सुरू झाली. दुपारी १ च्या सुमारास गोदामाची एक भिंत पडली. नंतर अर्ध्या तासाने स्लॅबही कोसळली.सात ते आठ कोटींचे नुकसानआग नेमकी कशाने लागली ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. आगीमुळे गोदामात ठेवलेली ३५ हजार क्विंटल तूर, १५ हजार क्विंटल धान आणि गव्हाचे १० हजार कट्टे तसेच अन्य साहित्यासह सुमारे ६० हजार क्विंटल धान्य जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या अग्निशमन अधिकारी चंदनखेडे यांनी लोकमतला दिली. त्याची किंमत सात ते आठ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग