शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अग्निशमन विभाग : नियम बदलले; एनओसीचे अर्ज आले निम्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:02 IST

Fire Brigade, nagpur news राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासोबतच अग्निशमन विभागाकडे एनओसीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे. याचा विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासोबतच अग्निशमन विभागाकडे एनओसीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे. याचा विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनुष्यबळ कमी असल्याने संकटाचा सामना करीत असलेल्या अग्निशमन विभागाला यामुळे थोडा दिलासाही मिळणार आहे.

नवीन नियमानुसार रहिवासी इमारत श्रेणीत आता १५ मीटर ऐवजी २५ मीटर उंचीच्या इमारतीसाठी अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे. तर व्यावसायिक वापराच्या इमारतीत १५० चौ.मीटर ऐवजी ५०० चौ.मीटर भूखंड असेल तरच एनओसी घ्यावी लागणार आहे.

१ डिसेंबरपासून नागपुरात नवीन नियम लागू झाले आहे. यामुळे परवानगीसाठी अग्निशमन विभागाकडे येणाऱ्या अर्जांची संख्या कमी झाली आहे.

उंच इमारतीसाठी अग्निशमन विभागाची मंजुरी आवश्यक असते. कारण आग लागल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी व्यवस्था असणे आवश्यक असते. शहरात आतापर्यंत ७० ते ८० मीटर उंचीच्या इमारती अभ्या राहिल्या आहेत. यामुळे अग्निशमन विभागाला बळकट करण्याची गरज आहे. नागपुरात २४३ रुग्णालयांना अग्निशमन विभागातर्फे एनओसी देण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार आता २४ मीटरहून अधिक उंचीच्या निवासी तर ५००चौ.मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या व्यावसायिक इमारतीसाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागणार आहे. यासाठी अर्ज करावे लागतील. अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

एनओसीसाठी आलेले अर्ज

 

वर्ष                 अर्ज

२०१२             १६७

२०१३             १६१

२०१४             १५६

२०१५             ११९

२०१६             १६८

२०१७             १८१

२०१८             १९९

२०१९             २७५

२०२०             १४२(नोव्हेंबरपर्यंत)

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर