शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वेस्टमध्ये व्हॅल्यू शोधा ; केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:53 IST

मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देस्टार्टअपचा ग्रॅण्ड फिनाले समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला कचरा याचे मूल्यवर्धन करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे नवीन संशोधकांना, स्टार्टअपनी शेती, कचरा, जंगल, बांबू यावर संशोधन करून, त्याची व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूजल व जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि कौशल्यविकास मंत्रालयाच्या वतीने राज्यात स्टार्टअप यात्रा काढण्यात आली होती. याचा ग्रॅण्ड फिनाले विश्वश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ऊर्जा व पालकमंत्री चंद्रश्ेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव असिम गुप्ता, व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार व व्हीएनआयटीचे संचालक प्रमोद पडोळे उपस्थित होते. ३ आॅक्टोबर रोजी मुंबई येथून स्टार्टअप यात्रेला सुरुवात झाली. राज्यातील १४ जिल्ह्यात स्टार्टअपच्या कार्यशाळा झाल्या. यातून ३१० स्टार्टअप निवडण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये यातून १९ स्टार्टअपला पुरस्कृत करण्यात आले. ग्रॅण्ड फिनालेतून निवडण्यात आलेल्या १९ स्टार्टअपना नितीन गडकरी यांच्याहस्ते पुरस्कृत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रसंगी विश्राम जामदार म्हणाले की, व्हीएनआयटीमध्ये इंटरप्रेन्युअरचा स्वतंत्र विभाग आहे. व्हीएनआयटीमध्ये प्लेसमेंट सुद्धा चांगल्या होतात. पण चांगल्या इन्स्टिट्यूटचा मापदंड हा जास्त प्लेसमेंट पेक्षा उद्योजक किती घडविले असा असला पाहिजे. यावेळी असिम गुप्ता म्हणाले की, तरुणांमध्ये भन्नाट आयडिया आहेत. पण त्या प्र्रोडक्टमध्ये कर्न्व्हट करता आल्या पाहिजे. तेव्हाच मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होईल. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. अभिनंदन पाटील ठरला स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेटस्टार्टअप ग्रॅण्ड फिनालेमध्ये उत्कृष्ट आयडिया मांडणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात स्टार्टअप हिरो आॅफ द स्टेटचा पुरस्कार कोल्हापूरच्या अभिनंदन पाटील यांनी पटकाविला. तर टॉप वूमन इंटरप्रेन्युअरचा पुरस्कार प्रियंका सरवदे, पूजा भलमीकर व मयुरी सावंत यांनी पटकाविला. त्याचबरोबर विविध गटामध्ये अर्जुन देवरणकर, मुकेश बिसेन, सुरेंद्र काळबांडे, दीपक सावंत, प्रियंका पाटील, हंसराज पारधी, डॉ. वैशाली कुळकर्णी, निकेश इंगळे, वैभव माधेकर, स्वागता कावळे, मधुरा राठी, योगेश भंडारी, आशिष चांदवलकर, अमित माहोरे, मिथिलेश हिंगे यांना पुरस्कृत करण्यात आले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर