शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

प्रत्येक कामात वेगळेपण शोधा

By admin | Updated: September 15, 2014 01:00 IST

कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास

राजेश खवले : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास यश पदरात पडते, असे प्रतिपादन यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज येथे केले.प्रयास-सेवांकुर, मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट व अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरच्यावतीने यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन दीक्षाभूमीजवळील द ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात करण्यात आले. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राजेश खवले म्हणाले, बिकट परिस्थितीत गावच्या शाळेत दहावीपर्यंत शिकलो. शेजारच्या गावातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन बारावी झालो. अमरावतीला बीएला प्रवेश मिळवून वडिलांना कपड्याच्या दुकानात मदत करू लागलो. टेपरेकॉर्डर विकत घेऊन स्वत:च्या आवाजात अनेक कॅसेट रेकॉर्ड केल्या. स्पर्धा परीक्षेचे १० हजार प्रश्न रेकॉर्ड केले. आंघोळीला गेल्यानंतरही टेपरेकॉर्डर लावून तो वेळ वाचवू लागलो. पदवीनंतर पीएसआय, एसटीआयची परिक्षा उत्तीर्ण होऊन मुंबईत नोकरी सुरू केली.तेथे काम करताना एमपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. चाळीतल्या वातावरणात, रेल्वेत, आॅफिसच्या फाईलमध्ये अभ्यासाचे कागद ठेवून अभ्यास करायचो. अखेर उपजिल्हाधिकारी संवर्गात महाराष्ट्रातून १० वा मेरिट आलो. आॅडिओ कॅसेटच्या तंत्राचा मोठा लाभ झाला. त्यानंतरही ते तंत्र न सोडता मान्यवरांच्या भाषणांच्या क्लिप तयार केल्या. व्हॉट्स अ‍ॅपवर क्लिप तयार केल्या. प्रशासकीय कामही मन लावून केले. भिलवाडा येथे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून दिले. तेथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखले नसल्यामुळे शिबिराचे आयोजन केले. चिखलदऱ्याला असताना तेथील लोक जाळण्यासाठी लाकडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या हातून तहसिल कार्यालयाच्या मागे वृक्ष लावून घेतले. आता तो परिसर चांगलाच हिरवागार झाला आहे. अंधश्रद्धेवर सुद्धा केलेल्या कामाला नरेंद्र दाभोळकरांसारख्या व्यक्तीने पावती दिली. जीवनात माणसाला अनेक चांगल्या बाबी माहीत असतात. परंतु त्या अमलात न आणल्यामुळे माणसाचे नुकसान होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी आपल्या कौटुंबिक वातावरणाची माहिती देऊन मुलांना वेळ देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभागृहात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)