शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

प्रत्येक कामात वेगळेपण शोधा

By admin | Updated: September 15, 2014 01:00 IST

कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास

राजेश खवले : प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवासनागपूर : कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी उत्सुकता महत्त्वाची आहे. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास जीवन जगताना प्रत्येक काम वेगळेपणाने करून माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास यश पदरात पडते, असे प्रतिपादन यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज येथे केले.प्रयास-सेवांकुर, मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट व अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरच्यावतीने यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन दीक्षाभूमीजवळील द ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात करण्यात आले. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राजेश खवले म्हणाले, बिकट परिस्थितीत गावच्या शाळेत दहावीपर्यंत शिकलो. शेजारच्या गावातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन बारावी झालो. अमरावतीला बीएला प्रवेश मिळवून वडिलांना कपड्याच्या दुकानात मदत करू लागलो. टेपरेकॉर्डर विकत घेऊन स्वत:च्या आवाजात अनेक कॅसेट रेकॉर्ड केल्या. स्पर्धा परीक्षेचे १० हजार प्रश्न रेकॉर्ड केले. आंघोळीला गेल्यानंतरही टेपरेकॉर्डर लावून तो वेळ वाचवू लागलो. पदवीनंतर पीएसआय, एसटीआयची परिक्षा उत्तीर्ण होऊन मुंबईत नोकरी सुरू केली.तेथे काम करताना एमपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. चाळीतल्या वातावरणात, रेल्वेत, आॅफिसच्या फाईलमध्ये अभ्यासाचे कागद ठेवून अभ्यास करायचो. अखेर उपजिल्हाधिकारी संवर्गात महाराष्ट्रातून १० वा मेरिट आलो. आॅडिओ कॅसेटच्या तंत्राचा मोठा लाभ झाला. त्यानंतरही ते तंत्र न सोडता मान्यवरांच्या भाषणांच्या क्लिप तयार केल्या. व्हॉट्स अ‍ॅपवर क्लिप तयार केल्या. प्रशासकीय कामही मन लावून केले. भिलवाडा येथे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून दिले. तेथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखले नसल्यामुळे शिबिराचे आयोजन केले. चिखलदऱ्याला असताना तेथील लोक जाळण्यासाठी लाकडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या हातून तहसिल कार्यालयाच्या मागे वृक्ष लावून घेतले. आता तो परिसर चांगलाच हिरवागार झाला आहे. अंधश्रद्धेवर सुद्धा केलेल्या कामाला नरेंद्र दाभोळकरांसारख्या व्यक्तीने पावती दिली. जीवनात माणसाला अनेक चांगल्या बाबी माहीत असतात. परंतु त्या अमलात न आणल्यामुळे माणसाचे नुकसान होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी आपल्या कौटुंबिक वातावरणाची माहिती देऊन मुलांना वेळ देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभागृहात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)