शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 01:13 IST

नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

ठळक मुद्देप्रतिष्ठाने सुरू करण्याची मागणी : अनावश्यक खर्चामुळे संचालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.उत्पन्न नसल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज आणि अन्य देखभाल खर्च करताना महत प्रयत्न करावे लागत आहे. भविष्यात हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही दैनंदिन खर्च, सुरक्षा व सॅनिटायझेशनचा अतिरिक्त खर्च, कच्च्या मालाची उपलब्धता, कामगारांचा तुटवडा आदींसह अनेक आव्हानामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार का, अशी चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. हॉटेलचालक, व्यवस्थापक, वेटर, आचारी, स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला पुरवठादार असे अनेक घटक या क्षेत्रावर अवलंबून आहेत.मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्यात आले. बँकांच्या कर्जाचे हप्ते, जागेचे भाडे, कामगारांचा पगार, वीज बिल आदींच्या खर्चामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. नियम आणि अटींच्या आधारे हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

व्यावसायिकांसमोर वर्षभर आर्थिक अडचणी राहणारग्राहकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. शासनाच्या शाश्वतीनंतरच हॉटेल व्यवसाय सुरळीत होणार आहे. ग्राहकांमध्ये स्वच्छतेचा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. त्याकरिता हॉटेल्स व रेस्टॉरंटचे वारंवार सॅनिटायझेशन, कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी, वेटरला मास्क व हॅन्डग्लोव्हज उपलब्ध करून द्यावे लागतील. कामगार स्वगृही परतल्याने तुटवडा भासणार आहे. दैनंदिन खर्चही अडचणीचा ठरणार आहे. पुढचे एक वर्ष व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.हॉटेल्स व लॉज सुरू करण्याची मागणीअन्य जिल्ह्यातून येणारे प्रवासी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करणार आहे. याबाबत एक निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देणार आहे. संपूर्ण जून महिना हॉटेल्स व लॉज बंद राहणार आहेत. ते लवकरच सुरू होऊन आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत.तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर