शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अखेरीस विदर्भात बरसल्या जलधारा; शेतकरीवर्ग सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:58 IST

Nagpur News संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: संपूर्ण जून महिना प्रतिक्षेत गेल्यानंतर बुधवारी रात्रीपासून नागपूर व विदर्भात पावसाला सुरूवात झाली. रोवणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या पावसाने धानाच्या पºह्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रात्रभरापासून सुरू असलेल्या व सौम्य स्वरुपात कोसळणाºया पावसाने नंतर पहाटे तीव्र रूप धारण केले. नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.उन्ह चांगले तापत असल्याने कोवळी पिके माना टाकत असल्याने शेतकरी घायकुली आला होता. पण बुधवारला विजेच्या कठाक्यात आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अमृतधारा बरल्याने शेतकरी आनंदून गेला. पिकांना संजिवनी मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असून सकाळी थांबलेला पावसाने परत सुरूवात केली आहे.

     दोन आठवड्यापासून पावसाने उघाड दिली होती. सेवाग्राम आणि परिसरातील शेतकरी नव्हे तर नागरिकही असह्य उन्ह आणि गर्मीमुळे त्रस्त झाले होते.घामाच्या धारा वाहत असल्याने‌ पावसाकडे लक्ष लागले होते. पाऊस पडावा यासाठी देवाला‌ साकडे घालण्यात आले. डी धोंडी पाणी दे असेही म्हणत काही गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. सर्वांचेच लक्ष‌ आभाळाकडे लागले होते.शेतकऱ्यांनी‌ तर दुबार पेरणी करावी‌ लागणार‌ याची चिंता लागली‌ होती. यातून आर्थिक घडी नक्कीच विस्कटविणारी होती.नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी साडेसात वाजतापासून नागपुरात आलेला पाऊस नऊ वाजेपर्यंत सुरू होता त्यानंतरही पावसाची उघडीप सुरूच आहे. शहराच्या अनेक भागात रिमझिम पाऊस येत आहे. नागपूर ग्रामीणमध्ये सर्व तालुक्यात पाऊस पडला, यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांना आहे.

 मागील 24 तासात गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यात 48 मिलिमीटर तर वर्धा जिल्ह्यात 23 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यातही गुरुवारी सकाळपर्यंत 10.5 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस