शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By admin | Updated: May 27, 2017 02:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या पुढाकारामुळे

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंनी घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या पुढाकारामुळे वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षेनंतर वसतिगृहात राहता येणार नाही, या नियमाचा दाखला देऊन या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना कुलूप लावण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा तयारी किंवा ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन आपली समस्या मांडली व डॉ.काणे यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तत्काळ पावले उचलली. ‘एलएलएम’सह विविध अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहात राहतात. बरेचसे विद्यार्थी हे सामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थी गावाकडे गेले होते. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू व्हायला अवकाश असला तरी यातील काही विद्यार्थी विविध कारणांमुळे अगोदरच परतले. अनेक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत तर ‘एलएलएम’च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशीप’ सुरू आहे. मात्र वसतिगृहात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खोल्यांना कुलुपे लागली होती. याबाबत त्यांनी ‘वॉर्डन’कडे विचारणा केली असता नियमांचा दाखला देण्यात आला. सुट्यांनंतर पुढील शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर नियमांनुसार प्रवेश घ्यावा लागेल. सध्या महाविद्यालये सुरू नसल्याने तेथे राहता येणार नाही, असे सांगण्यात आले. जर रहायचे असेल तर विद्यापीठात वेगळे शुल्क भरावे लागेल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चिंतित विद्यार्थ्यांनी गुरुवार व शुक्रवार अशी सलग दोन दिवस कुलगुरूंची भेट घेतली व आपली समस्या मांडली. आम्ही अद्यापही विद्यापीठाचेच विद्यार्थी असूनदेखील आम्हाला राहू दिले जात नाही. अतिरिक्त शुल्क भरणे आम्हाला शक्य नाही, असे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सांगितले. याबाबत कुलगुरूंनी विद्यार्थीहिताला प्राधान्य देत संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज करायला सांगितला व त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. नियमांनुसार विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये राहता येत नाही. मात्र अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षांसाठी अर्ज भरल्याची पावती जोडून त्यांनी अर्ज करावा. तसेच ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वकिलांचे पत्र लावून अर्ज केल्यावर त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यापीठ हे विद्यार्थी हितासाठीच आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे कुलगुरूंनी ‘लोकमत’ला सांगितले.