शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

अखेर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By admin | Updated: May 27, 2017 02:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या पुढाकारामुळे

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंनी घेतला पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या पुढाकारामुळे वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परीक्षेनंतर वसतिगृहात राहता येणार नाही, या नियमाचा दाखला देऊन या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना कुलूप लावण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा तयारी किंवा ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन आपली समस्या मांडली व डॉ.काणे यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तत्काळ पावले उचलली. ‘एलएलएम’सह विविध अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहात राहतात. बरेचसे विद्यार्थी हे सामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थी गावाकडे गेले होते. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू व्हायला अवकाश असला तरी यातील काही विद्यार्थी विविध कारणांमुळे अगोदरच परतले. अनेक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत तर ‘एलएलएम’च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशीप’ सुरू आहे. मात्र वसतिगृहात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या खोल्यांना कुलुपे लागली होती. याबाबत त्यांनी ‘वॉर्डन’कडे विचारणा केली असता नियमांचा दाखला देण्यात आला. सुट्यांनंतर पुढील शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर नियमांनुसार प्रवेश घ्यावा लागेल. सध्या महाविद्यालये सुरू नसल्याने तेथे राहता येणार नाही, असे सांगण्यात आले. जर रहायचे असेल तर विद्यापीठात वेगळे शुल्क भरावे लागेल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चिंतित विद्यार्थ्यांनी गुरुवार व शुक्रवार अशी सलग दोन दिवस कुलगुरूंची भेट घेतली व आपली समस्या मांडली. आम्ही अद्यापही विद्यापीठाचेच विद्यार्थी असूनदेखील आम्हाला राहू दिले जात नाही. अतिरिक्त शुल्क भरणे आम्हाला शक्य नाही, असे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना सांगितले. याबाबत कुलगुरूंनी विद्यार्थीहिताला प्राधान्य देत संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज करायला सांगितला व त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. नियमांनुसार विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये राहता येत नाही. मात्र अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षांसाठी अर्ज भरल्याची पावती जोडून त्यांनी अर्ज करावा. तसेच ‘इंटर्नशीप’ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वकिलांचे पत्र लावून अर्ज केल्यावर त्यांना राहण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यापीठ हे विद्यार्थी हितासाठीच आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे कुलगुरूंनी ‘लोकमत’ला सांगितले.