शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धारीवाल कंपनीचे पाय जमिनीवर, चूक झाल्याचे केले मान्य; शेतकरी हितासाठी उपाययोजना करण्याची दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:45 IST

Nagpur : हायकोर्टाच्या दणक्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील पॉवरस्टेशनच्या पाणी पाईपलाईनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पाय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसल्यानंतर जमिनीवर आले. कंपनीने बुधवारी त्यांची चूक झाल्याचे मान्य करून शेतकरी हिताकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व तृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी व धारीवाल कंपनीने या प्रकरणातील मुद्यांवर १८ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सात आदेशांची माहिती सादर केली तसेच, धारीवाल कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी याचिकेवर येत्या २९ एप्रिलला पुढील सुनावणी निश्चित केली.

प्रामाणिकतेसाठी जमा केले ५० लाखगेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी रेकॉर्डवरील विविध मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून धारीवाल कंपनी जबाबदारीने वागत नसल्याचा आरोप केला होता. त्यात प्रथमदृष्ट्या तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने धारीवाल कंपनीला स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनीने ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. त्याची पावती बुधवारी न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्यात आली.

असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • धारीवाल कंपनीने पाईपलाईनची १ दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी शिवधुऱ्यावर नऊ महिन्यांत कच्चा रस्ता तयार करावा.
  • सध्या होत असलेली पाईपलाईनची गळती प्रशासकीय प्रतिनिधी व पीडित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दुरुस्त करण्यात यावी.
  • पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी विशेष यंत्रणा सतत सक्रिय ठेवावी. भविष्यात गळती झाल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.
  • पाणी गळतीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी व्हॅटव्हालखाली सिमेंटचे टाके तयार करावे. शेतपिकांची काळजी घ्यावी.
  • संयुक्त समितीच्या अहवालानुसार शेतपिकांच्या नुकसानीचा मोबदला तत्काळ पीडित शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा.
  • खासगी शेतीमधील पाईपलाईन काढून ती शिवधुऱ्यावरून दोन मीटर खोलात टाकावी. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करावे.
  • सरकारी जमिनीवर पाईपलाईन टाकण्यात आल्याने सरकारकडे दरवर्षी ३ लाख ३७ हजार ५९३ रुपये शुल्क जमा करावे.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय