शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

अखेर धारीवाल कंपनीचे पाय जमिनीवर, चूक झाल्याचे केले मान्य; शेतकरी हितासाठी उपाययोजना करण्याची दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:45 IST

Nagpur : हायकोर्टाच्या दणक्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील पॉवरस्टेशनच्या पाणी पाईपलाईनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पाय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसल्यानंतर जमिनीवर आले. कंपनीने बुधवारी त्यांची चूक झाल्याचे मान्य करून शेतकरी हिताकरिता आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व तृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी व धारीवाल कंपनीने या प्रकरणातील मुद्यांवर १८ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सात आदेशांची माहिती सादर केली तसेच, धारीवाल कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी याचिकेवर येत्या २९ एप्रिलला पुढील सुनावणी निश्चित केली.

प्रामाणिकतेसाठी जमा केले ५० लाखगेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी रेकॉर्डवरील विविध मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधून धारीवाल कंपनी जबाबदारीने वागत नसल्याचा आरोप केला होता. त्यात प्रथमदृष्ट्या तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने धारीवाल कंपनीला स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनीने ही रक्कम न्यायालयात जमा केली आहे. त्याची पावती बुधवारी न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्यात आली.

असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • धारीवाल कंपनीने पाईपलाईनची १ दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी शिवधुऱ्यावर नऊ महिन्यांत कच्चा रस्ता तयार करावा.
  • सध्या होत असलेली पाईपलाईनची गळती प्रशासकीय प्रतिनिधी व पीडित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दुरुस्त करण्यात यावी.
  • पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी विशेष यंत्रणा सतत सक्रिय ठेवावी. भविष्यात गळती झाल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.
  • पाणी गळतीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी व्हॅटव्हालखाली सिमेंटचे टाके तयार करावे. शेतपिकांची काळजी घ्यावी.
  • संयुक्त समितीच्या अहवालानुसार शेतपिकांच्या नुकसानीचा मोबदला तत्काळ पीडित शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा.
  • खासगी शेतीमधील पाईपलाईन काढून ती शिवधुऱ्यावरून दोन मीटर खोलात टाकावी. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करावे.
  • सरकारी जमिनीवर पाईपलाईन टाकण्यात आल्याने सरकारकडे दरवर्षी ३ लाख ३७ हजार ५९३ रुपये शुल्क जमा करावे.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय