शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अखेर केंद्राला विदर्भातील पूरग्रस्त शेतकरी आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 23:45 IST

flood-hit farmers of Vidarbha, nagpur news अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नागपुरात दाखल होत आहेत. विदर्भात चार महिन्यांपूर्वी पूर आला. अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी उद्यापासून दोन दिवस करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय पथक आज पाहणी करणार : चार महिन्यानंतर होणार नुकसानीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नागपुरात दाखल होत आहेत. विदर्भात चार महिन्यांपूर्वी पूर आला. अतिवृष्टी झाली. त्याची पाहणी उद्यापासून दोन दिवस करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी तब्बल चार महिन्यानंतर होत आहे, यावरून केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे दिसून येते.

ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या आदेशावरून नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. यात लाखो हेक्टर शेतपीक उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले. राज्य सरकारने पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली. परंतु हा निधी तोकडा असल्याची टीका झाली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडून केंद्र सरकारला दिला. मुख्यमत्री, मुख्य सचिव व मदत व पुनर्वसन विभागाने अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु केंद्राकडून पथक पाठविण्यात आला नसल्याचा आरोप खुद्द मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आता केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पथक पाठविण्यात येणार आहे. २४ डिसेंबरपासून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याची नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल.

दोन पथक करणार पाहणी

केंद्रातून आलेल्या पथकाचे दोन गटात विभागणी होणार असून यातील एक गट २४ डिसेंबर रोजी नागपूर व २५ ला भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तर दुसऱ्या गटातील अधिकारी २४ ला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी करतील.

टॅग्स :FarmerशेतकरीfloodपूरVidarbhaविदर्भ