शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अंतिम झालेला आदेश बदलता येत नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 05:50 IST

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १३ मार्च २००७ रोजी अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक ममता हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून महिला कर्मचाऱ्याच्या नोकरीला मिळालेले संरक्षण कायम ठेवले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व ऊर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने १३ मार्च २००७ रोजी अनुसूचित जमातीचा दावा नामंजूर केल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक ममता हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. १९ ऑगस्ट २०१३ ला उच्च न्यायालयाने अनुसूचित जमातीच्या लाभांचा त्याग करण्याच्या अटीवर हेडाऊ यांच्या नोकरीला संरक्षण  दिले. त्याविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले नाही. त्यामुळे त्या आदेशाला अंतिम स्वरुप प्राप्त झाले. त्यानंतर ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रकरणावरील निर्णयामध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम ठेवले जाऊ शकत नाही, असे जाहीर केले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर २०१९ रोजी हेडाऊ यांना बडतर्फीची नोटीस जारी केली होती. परिणामी, हेडाऊ यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय