शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

फाईलचा प्रवास थांबला; विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:30 IST

आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला आधीच कात्री लावली आहे. त्यानंतरही सत्तापक्षाने मवाळ भूमिका घेतली आहे. पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवकच नव्हे तर तीन ते चारवेळा निवडून आलेल्या नगरसेवकांनाही प्रशासन जुमानत नाही. एवढेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंजुरीपत्र दिल्यानंतरही नगरसेवकांच्या फाईलचा प्रवास थांबला आहे. यामुळे विरोधक नाराज असून सत्तापक्ष व प्रशासनाला सभागृहात जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती अध्यक्षांच्या पत्रानंतरही मंजुरी नाही : हक्काचा निधी मिळत नसल्याने नगरसेवक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला आधीच कात्री लावली आहे. त्यानंतरही सत्तापक्षाने मवाळ भूमिका घेतली आहे. पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवकच नव्हे तर तीन ते चारवेळा निवडून आलेल्या नगरसेवकांनाही प्रशासन जुमानत नाही. एवढेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंजुरीपत्र दिल्यानंतरही नगरसेवकांच्या फाईलचा प्रवास थांबला आहे. यामुळे विरोधक नाराज असून सत्तापक्ष व प्रशासनाला सभागृहात जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.जून महिन्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महिनाभराने आयुक्तांनी स्वाक्षरी केली. परंतु सोबतच आर्थिक स्थितीचा विचार करता फिक्स प्रायोरिटी व झोन अर्थसंकल्पातील निधीवर निर्बंध घातले. हक्काचा निधी असूनही यावर निर्बंध घातल्याने नगरसेवक नाराज आहेत. मागील सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात अजूनही नगरसेवकांच्या फाईल मंजूर होत नसल्याचे चित्र आहे.जुलैनंतर आॅगस्ट महिना संपत आहे. परंतु फाईल मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही. नवीन विकास कामे पूर्णपणे ठप्प आहेत. पावसाळ्याच्या दिवसात निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी व कार्यादेश देण्याच्या स्थितीपर्यंत फाईलचा प्रवास होतो. दिवाळी संपली की कामांना सुरुवात केली जाते. परंतु यावेळी ही प्रक्रिया थांबलेली आहे.नगरसेवकांच्या फाईल मंजूर होत नसल्याने शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी महापालिकेवर हल्लाबोल करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळ महापौर नंदा जिचकार यांना भेटले होते. फाईल मंजूर होत नसतील तर महापालिका बरखास्त करण्याची मागणी वनवे यांनी केली होती.सत्तापक्ष व प्रशासनाला जाब विचारणारनगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिले असल्याने प्रभागातील विकास कामे ही त्यांची प्राथमिकता आहे. परंतु फिक्स प्रायोरिटी व वॉर्ड निधीतूनही कामे होत नाही. अशा परिस्थितीत भाजपाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नगरसेवकांच्या प्रलंबित फाईल्स मंजूर न झाल्यास विरोधक सभागृहात आक्रमक भूमिका घेतील. सत्तापक्ष व प्रशासनाला जाब विचारणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दिला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाagitationआंदोलन