शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019; मैदानातील प्रचार थांबला तरी सोशल मीडियावर चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 15:53 IST

सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे.

ठळक मुद्देमतदारांना येतोय अनुभवप्रचारतोफा थंडावताच कार्यकर्ते सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपली. मात्र प्रचारतोफा थंडावताच सोशल मीडियावरून वॉरला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वॉच ठेवणारी यंत्रणा सायबर सेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने या नियंत्रणासाठी मदतीला घेतली असली तरी सोशल मीडियावचा छुपा प्रचार मात्र धडाकून सुरू आहे.शनिवारी सायंकाळी प्रचार संपला असल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला ३६ तास बाकी उरतात. सोमवारी २१ आॅक्टोबरला मतदान आहे. या मिळालेल्या वेळेचा बहुतेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारासाठी उपयोग करून घेतल्याचे चित्र आहे. एमएमएस, व्हाईस मॅसेज या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक उमेदवारांनी ठरविलेले प्रचाराच्या व्हाईस मॅॅसेजचे पॅकेज शनिवारपासून अचानकपणे कार्यरत झाले असून, अनेकांच्या मोबाईलवर या माध्यमातून उमेदवारांचा आवाज पोहचत आहे. यासोबतच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातूनही आपल्या नेत्याची हवा तयार करणे कार्यकर्त्यांकडून सुरूच आहे.विशेष म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियाचा वापर चालणार आहे. यामुळे खुला प्रचार संपला असला तरी छुपा प्रचार मात्र वेगात सुरू झाला आहे. सोशल मीडियावरून सुरू असलेल्या या प्रचाराचा अनुभव अनेक मतदारांना आला आहे.

सायबर सेलकडे यंत्रणाच नाहीया सर्व प्रकारांवर वॉच ठेवणारी सक्षम यंत्रणाच सायबर सेलकडे नसल्याचे दिसत आहे. मोबाईलधारकांची आणि त्याच्या वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामत: सोशल मीडियावरील प्रचाराला आवर घालताना यंत्रणेची दमछाक होत आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया