शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विद्वानांचा सत्कार म्हणजे शास्त्राची पूजा : श्रीनिवास वरखेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:00 IST

धर्मासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, तर अधर्माच्या नाशासाठी शस्त्राचा आधार घेतात. धर्मासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणे म्हणजे एकप्रकारे शास्त्राची पूजा करणे होय, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.

ठळक मुद्देस्वानंद पुंड यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्मासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, तर अधर्माच्या नाशासाठी शस्त्राचा आधार घेतात. धर्मासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणे म्हणजे एकप्रकारे शास्त्राची पूजा करणे होय, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सायंटिफीक सभागृहात सुप्रसिद्ध गाणपत्य विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांना २०१९ चा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर सुप्रसिद्ध शिवकथाकार, सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख, सत्कारमूर्ती प्रा. स्वानंद पुंड, आर्य दयानंद कन्या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. वंदना खुशालानी उपस्थित होत्या. डॉ. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, समाजातील पूज्य व्यक्तींचा सत्कार व्हायला हवा. परंतु आज अपूज्य व्यक्तींचा सत्कार करणे ही समाजाची व्यवस्था झाली आहे. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिजामातेच्या नावाने पुरस्कार देण्यात येत असल्यामुळे आवर्जून कार्यक्रमाला येण्याचे ठरविले. संस्कार देण्याचा विषय निघाला की जिजामातेचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्गुरुदास महाराज विजयराव देशमुख यांनी स्वानंद पुंड यांचे कार्यच मोठी उपासना असल्याचे मत व्यक्त करून त्यांच्यावर सदैव जिजाऊ, श्री गणेशाचा आशीर्वाद राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. सत्कारमूर्ती प्रा. स्वानंद पुंड म्हणाले, जिजामातेच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार स्वर्गाच्या वाटेवरील पासपोर्ट आहे. पुरस्काराच्या नावासाठी आपला विचार व्हावा हाच मोठा पुरस्कार होता. जिजाऊंसारखे अधिष्ठान असले तरच छत्रपती घडू शकतात. हा पुरस्कार आयुष्याचे सार्थक आहे. सज्जनांना योग्य वाटावे असे प्रत्येकाचे जीवन असणे आवश्यक आहे. जीवन हे यज्ञ असावे. पूर्वी यज्ञामुळे औषधीद्रव्य मिळायचे. परंतु आता यज्ञ संस्कृतीच लोप पावली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुराणांची रचना मृत्यूनंतर स्वर्ग मिळण्यासाठी नव्हे तर याच जगाला स्वर्ग करण्यासाठी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. स्वानंद पुंड यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, ५१ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मानपत्राचे वाचन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. संचालन श्रद्धा भारद्वाज यांनी केले. आभार प्रसन्न बारलिंगे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूर