शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

यंदाच्या दिवाळीत उपराजधानीत प्रदूषणाचा उच्चांक होण्याची भीती; एक्यूआरने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 07:00 IST

Nagpur News यावर्षी उपराजधानीत फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेचा इंडेक्स १५१वर हवा

निशांत वानखेडेनागपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांना मनाप्रमाणे सण, उत्सव साजरे करता आलेले नाहीत. मात्र, यावर्षी परिस्थिती सुधारली आहे. अशावेळी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे यावर्षी फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दिवाळी आली की कमी फटाके फोडण्याचे आवाहन सर्वच प्रशासकीय संस्थांकडून केले जाते. लोकांमध्ये याबाबत जागृती होत असली तरी बहुतेकांचा फटाक्यांचा मोह सुटत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. नागपूरच्या वातावरणातील सर्वाधिक प्रदूषित घटक म्हणून धुलीकण म्हणजे 'पार्टिकुलेट मॅटर' (पीएम - २.५ व पीएम - १०)चा समावेश आहे. विकास प्रकल्प, उद्योग तसेच बांधकामात वाढ झाल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमुळे धुलीकणांत वाढ तर होतेच, शिवाय सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, लेड, निकेल, आर्सेनिक, ओझोन ३ व इतर घटकांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते.

२०१३ पासून सातत्याने वाढ२०१३ मध्ये दिवाळीत पीएम - १०चे प्रदूषण सदरमध्ये सर्वाधिक २३४ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर (एमपीसीएम) होते. २०१४  मध्ये उत्तर अंबाझरी मार्गावर २३४ एमपीसीएम व सदर भागात २७० एमपीसीएम होते. २०१५मध्ये हा स्तर उत्तर अंबाझरी मार्गावर स्टॅन्डर्ड स्तराच्या तिप्पट म्हणजे ३०५ एमपीसीएमवर पोहोचला होता. दिवाळीनंतरच्या दुस?्या दिवशी २११ एमपीसीएम होता. २०१६मध्ये सिव्हील लाईन्स, अंबाझरी व सदर भागात अनुक्रमे १६१, १३५ व १७५वर होता. २०१७मध्ये फटाक्यांमुळे पाचपट वाढ झाली व ५०० एमपीसीएमवर पोहोचल्याची नोंद आहे.एअर क्वालिटी इंडेक्समध्ये वाढ- २०१६मध्ये एक्युआय १३८, २०१७मध्ये १८२, २०१८मध्ये २२२, २०१९मध्ये ११५ तर २०२०मध्ये १६८ एक्युआय.- पीएम - २.५ २०१७मध्ये ५०.२ एमपीसीएम, २०१८मध्ये ४६.६ एमपीसीएम, २०१९मध्ये ४७.२ एमपीसीएम.रात्री ८ ते १० ची मुदत निष्प्रभ२०१९ साली केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने फटाक्यांवर नियंत्रणासाठी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुदत दिली होती. मागील वर्षी हे निर्देशही निष्प्रभ ठरले. रात्री ८ पूर्वीच सुरू झालेली आतषबाजी उशिरा रात्री २.३०पर्यंत चालली.

नीरी ठेवणार नजरराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) दरवर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरच्या प्रदूषण स्तरावर व त्यातील घटकांवर नजर ठेवणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण