शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने उष्माघात पळाला : दोन वर्षांपासून उष्माघाताची एकही नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 20:56 IST

sun stroke मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाला उष्माघात घाबरला की काय, असे वाटत आहे. २०२० आणि चालू असलेल्या २०२१ या दोन वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही. या उलट २०१९ मध्ये मात्र उष्माघाताचे ८६ रुग्ण जिल्ह्यात नोंदविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाला उष्माघात घाबरला की काय, असे वाटत आहे. २०२० आणि चालू असलेल्या २०२१ या दोन वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही. या उलट २०१९ मध्ये मात्र उष्माघाताचे ८६ रुग्ण जिल्ह्यात नोंदविण्यात आले होते.

नागपुरातील उन्हाळा दरवर्षीच कडक असतो. येथील तापमानाचा पारा दरवर्षी ४५ अंशाच्या वर असतो; परंतु २०२० मध्ये मार्च महिन्यात आलेल्या कोरोना संक्रमणामुळे कडक लॉकडाऊन झाले. ते जून महिन्यापर्यंत चालले. संक्रमणाच्या भीतीने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मागील वर्षी उन्हही चांगले पडले. ४५ ते ४६ अंशाच्या वर पारा होता. मात्र, नागिरकांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतल्याने उष्माघाताची घटना जिल्ह्यात घडली नाही. यावर्षीही १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे.

उष्माघाताच्या रुग्णांवरील उपचारासाठी दरवर्षी रुग्णालयात विशेष आयसोलेशन वॉर्ड उभारला जातो. कक्षही स्थापन केला जातो. यंदा त्याची गरजच न पडल्याने या वॉर्डाचे रूपांतर आता कोरोना आयसोलेशन वॉर्डात करण्यात आले आहे.

उष्माघाताची स्थिती

२०१९ - ८६ रुग्ण (मृत्यू नाही)

२०२० - निरंक

२०२१ - निरंक

ऊन वाढले तरी !

एप्रिल, मे, जून हे महिने नागपुरात प्रचंड उष्णतामानाचे असतात. यावर्षी ६ मे हा दिवस सर्वाधिक उष्णतामानाचा ठरला. ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल १३ मे रोजी ४१.९ व ५ मे रोजी ४१.८, असे तापमान होते. एप्रिलचा पहिला आठवडाही तापलेला होता. ६ एप्रिलला ४२ अंश सेल्सिअस, तर ७ एप्रिल ४१.८ अंश सेल्सिअस तापमान होते. सध्या आठवडाभरापासून वातावरण बदलले आहे. दोन दिवसांपासून पारा ३७ ते ३८ वर आहे.

उन्हाळा घरातच

कोरोना संक्रमणामुळे सारे घरातच असल्याने संपूर्ण उन्हाळा घरातच निघाला. मुलांच्या शाळा भरल्या नाहीत. ऑनलाइन शाळा, ऑनलाइन क्लास आणि ऑफिसही ऑनलाइन अशी स्थिती आहे. महत्त्वाच्या कामासाठीच सकाळी बाहेर पडणे होत असल्याने सारेच सुरक्षित आहेत.

कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिकांनी या मागील वर्षी आणि वर्षातही घरातच राहणे पसंत केले. यामुळे दरवर्षी दिसणारे उष्माघाताचे आकडे यंदा दिसले नाहीत. दोन वर्षांपूर्वीची स्थिती नाही.

-दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Sun strokeउष्माघातnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या