शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एफडीए करणार नागपुरातील हॉटेल्सची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:07 IST

एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोहीम मतमोजणीनंतर सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देअस्वच्छतेवर नोटीस बजावणार : दंडही आकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोहीम मतमोजणीनंतर सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.बहुतांश हॉटेल्सचे किचन अस्वच्छहॉटेल पॉश असले तरीही किचन अस्वच्छ असल्याचे अनेकदा दिसून येते. हॉटेल्सची नियमित तपासणी करावी, अशी मागणी अनेक संघटना आणि नागरिकांची आहे. हॉटेलचा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असल्याने नियमही कठोर तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर विभाग कारवाई करीत नाहीत, हे गूढच आहे. अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार हॉटेलचे किचन स्वच्छ असावे, असा नियम आहे. अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ ची अंमलबजावणी ५ऑगस्ट २०११ पासून सुरू झाली. मात्र, अनेक हॉटेल्सनी या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसविल्या असल्याचे दिसून येत आहे. हॉटेल्समधील स्वादिष्ट पदार्थ ज्या किचनमध्ये बनविले जातात ते किचनच किळसवाणे असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.हॉटेल्सवर कठोर कारवाईची मागणीअन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर शिक्षेची तरतूद आहे. तपासणीत दोषी आढळल्यास हॉटेलमालकाला नोटीस पाठविली जाते. सुधारणा करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर उल्लंघनाचे गांभीर्य ओळखून कारवाई केली जाते. काही कालावधीसाठी परवाना निलंबित किंवा रद्दही केला जातो. या प्रकरणांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांकडे याची सुनावणी होते. दोषी आढळल्यास दोन लाखांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येतो. गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी खटलेही दाखल केले जातात. यात सहा महिन्यांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.परवाना न घेता व्यवसाय अवैधचशहरात अन्न व औषधी प्रशासन विभागाचा परवाना न घेता अनेक हॉटेल्स सुरू आहेत. याशिवाय रात्री रस्त्याच्या कडेला हातठेला लावून खाद्यान्नांची विक्री बेकायदेशीर होत आहे. त्यांच्याकडे विभागाचा परवाना नाहीच. त्यानंतर कुणाची भीती न बाळगता व्यवसाय सुरूच आहे. अशा हातठेल्यांवर विभागाने अजूनही कारवाई केलेली नाही. त्यांची तपासणीची मोहीम राबविण्याची गरज आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर असे प्रकार बंद होतील, असे नागरिकांनी सांगितले.

अस्वच्छतेबद्दल दंड आकारणारविभागातर्फे शहरातील हॉटेल्सची नियमित तपासणी करण्यात येते. पण आता ही तपासणी धडक मोहीम राबवून करण्यात येणार आहे. किचन अस्वच्छ असल्यास सुधारणेसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रसंगी दंडही आकारणार आहे. सर्व हॉटेल्सने अन्नसुरक्षा व मानद कायदा-२००६ चे पालन करणे बंधनकारक आहे. कर्मचाºयांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी. शिवाय किचनच्या माहितीचा बोर्ड दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)अन्न व औषधी प्रशासन विभाग.

टॅग्स :hotelहॉटेलFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग