शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

एफडीए करणार नागपुरातील हॉटेल्सची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:07 IST

एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोहीम मतमोजणीनंतर सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देअस्वच्छतेवर नोटीस बजावणार : दंडही आकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोहीम मतमोजणीनंतर सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.बहुतांश हॉटेल्सचे किचन अस्वच्छहॉटेल पॉश असले तरीही किचन अस्वच्छ असल्याचे अनेकदा दिसून येते. हॉटेल्सची नियमित तपासणी करावी, अशी मागणी अनेक संघटना आणि नागरिकांची आहे. हॉटेलचा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असल्याने नियमही कठोर तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर विभाग कारवाई करीत नाहीत, हे गूढच आहे. अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार हॉटेलचे किचन स्वच्छ असावे, असा नियम आहे. अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ ची अंमलबजावणी ५ऑगस्ट २०११ पासून सुरू झाली. मात्र, अनेक हॉटेल्सनी या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसविल्या असल्याचे दिसून येत आहे. हॉटेल्समधील स्वादिष्ट पदार्थ ज्या किचनमध्ये बनविले जातात ते किचनच किळसवाणे असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.हॉटेल्सवर कठोर कारवाईची मागणीअन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ नुसार आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर शिक्षेची तरतूद आहे. तपासणीत दोषी आढळल्यास हॉटेलमालकाला नोटीस पाठविली जाते. सुधारणा करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर उल्लंघनाचे गांभीर्य ओळखून कारवाई केली जाते. काही कालावधीसाठी परवाना निलंबित किंवा रद्दही केला जातो. या प्रकरणांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांकडे याची सुनावणी होते. दोषी आढळल्यास दोन लाखांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येतो. गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी खटलेही दाखल केले जातात. यात सहा महिन्यांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.परवाना न घेता व्यवसाय अवैधचशहरात अन्न व औषधी प्रशासन विभागाचा परवाना न घेता अनेक हॉटेल्स सुरू आहेत. याशिवाय रात्री रस्त्याच्या कडेला हातठेला लावून खाद्यान्नांची विक्री बेकायदेशीर होत आहे. त्यांच्याकडे विभागाचा परवाना नाहीच. त्यानंतर कुणाची भीती न बाळगता व्यवसाय सुरूच आहे. अशा हातठेल्यांवर विभागाने अजूनही कारवाई केलेली नाही. त्यांची तपासणीची मोहीम राबविण्याची गरज आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर असे प्रकार बंद होतील, असे नागरिकांनी सांगितले.

अस्वच्छतेबद्दल दंड आकारणारविभागातर्फे शहरातील हॉटेल्सची नियमित तपासणी करण्यात येते. पण आता ही तपासणी धडक मोहीम राबवून करण्यात येणार आहे. किचन अस्वच्छ असल्यास सुधारणेसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रसंगी दंडही आकारणार आहे. सर्व हॉटेल्सने अन्नसुरक्षा व मानद कायदा-२००६ चे पालन करणे बंधनकारक आहे. कर्मचाºयांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी. शिवाय किचनच्या माहितीचा बोर्ड दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)अन्न व औषधी प्रशासन विभाग.

टॅग्स :hotelहॉटेलFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग