शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या भेटीसाठी बापाचा तुटतोय जीव!

By admin | Updated: October 29, 2015 03:08 IST

मानवी चुकीने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीताला तिच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी देशाची अवघी यंत्रणा धडपडत असताना नागपुरात मात्र सरकारी यंत्रणाच बापलेकाच्या भेटीआड आली आहे.

सरकारी धोरणाचा फटका : बाल कल्याण समितीच नसल्याने वाढल्या अडचणीमंगेश व्यवहारे नागपूरमानवी चुकीने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या गीताला तिच्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी देशाची अवघी यंत्रणा धडपडत असताना नागपुरात मात्र सरकारी यंत्रणाच बापलेकाच्या भेटीआड आली आहे. शासनाच्या उफराट्या धोरणाचा फटका बापलेकांना सहन करावा लागतो आहे. गीताला जे लाभले तसे नशीब अद्यापतरी या दुर्दैवी बापलेकाच्या वाट्याला आले नाही. बापाचे नाव जल्लालुद्दीन खान असून, तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील दुपेला गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे बापाच्या चुकीमुळे १२ वर्षीय रियाजवर ही वेळ आली आहे. जल्लालुद्दीन नागपुरातील पिवळी नदी परिसरातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्यात काम करीत होता. त्याच्यासोबत मुलगाही तेथेच रहायचा. दीड वर्षांपूर्वी जलालुद्दीन कारखान्यात चोरी करून एकटाच पसार झाला. तेव्हापासून कारखाना मालकाने त्याच्या मुलाला स्वत:च्या ताब्यात ठेवले. बापाचे काम तो मुलाकडून करून घ्यायचा. प्लॅस्टीक वितळविण्याचे धोकादायक काम करताना तो जखमी झाला होता. एकप्रकारे मालकाकडून बापाच्या गुन्ह्याची शिक्षा मुलगा भोगत होता. चाईल्ड लाईनच्या सदस्यांना हा मुलगा आढळला. चाईल्ड लाईनने याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्याला दिली. पोलीस आणि बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी मुलाला मालकाच्या ताब्यातून सोडवून घेतले. बाल कामगार अधिनियमानव्ये कारखाना मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. चिमुकल्या रियाजची सुटका करून त्याला बाल संरक्षण कक्षाकडे पोलिसांनी सुपुर्द केले. मुलाच्या पुनर्वसनाची जबाबदारी बाल संरक्षण कक्षाची असल्याने, या कक्षाने मुलाला बालसदनमध्ये ठेवले. संरक्षण कक्षातर्फे त्याच्या पालकाचा शोध घेण्यात आला. उत्तर प्रदेशात असणाऱ्या त्याच्या बापाला सूचना देण्यात आली. दीड वर्षांपासून मुलाची भेट न झाल्याने व्याकुळ झालेल्या बाप दुसऱ्याच दिवशी नागपुरात पोहचला. परंतु सरकारी धोरणामुळे बापलेकाची भेट होऊ शकली नाही.अधिकारीही सांगतात नियमनागपूर : नियमानुसार रेस्क्यू करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे अधिकार केवळ बाल कल्याण समितीला आहेत. परंतु गेल्या महिन्याभरापासून बाल कल्याण समिती कार्यरतच नसल्याने रियाजला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करता येत नाही. त्यामुळे जलालुद्दीन आपल्या मुलाच्या भेटीसाठी सरकारी यंत्रणेचे उंबरठे झिजवितो आहे. प्रशासनातील अधिकारीही नियमाचा हवाला देत बापलेकाची भेट करवून देण्यास हतबल ठरताहेत. बालकांच्या बाबतीत प्रशासन उदासीनकाळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अल्पवयीन बालकांच्या न्याय निवाड्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून बालकल्याण समितीची नियुक्ती करण्यात येते. समितीला न्यायालयाचे अधिकार आहे. नागपूर बालकल्याण समितीच्या कामकाजावर आक्षेप घेऊन महिला व बालकल्याण समितीने ३ आॅगस्टला समितीला बर्खास्त केले. तेव्हापासून बालकांचे प्रश्न सातत्याने प्रलंबित आहेत. या समितीची जबाबदारी विभागाने वर्धा समितीकडे सोपविली होती. परंतु त्यांनीही इन्कार केला होता. त्यामुळे भंडारा समितीला नागपूरचा चार्ज देण्यात आला. परंतु भंडारा समितीनेही चार बैठका घेऊन काम करण्यास नकारात्मकता दर्शविली. त्यामुळे महिनाभरापासून नागपुरात बालकल्याण समितीच नाही. त्यामुळे रियाजसारखी अनेक बालके निरीक्षण गृहात, बालसदनात अडकली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर बैठक घेऊन समितीच्या नियुक्तीचे निर्देश महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नागपूरसारख्या शहराला समिती मिळाली नाही. जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.(प्रतिनिधी) आम्ही हतबल आहोतपीडित बालकांना रेस्क्यू करून त्यांचे पुनर्वसन करणे आमची जबाबदारी आहे. त्यानुसार कारखान्यावर धाड टाकून रियाजला आम्ही ताब्यात घेतले. त्याला पालकांच्या सुपूर्द करण्यासाठी त्याच्या वडिलांचा शोध घेतला. मुलाला कुटुंबापर्यंत सोपविण्यापूर्वी त्याची काळजी आणि संरक्षणासाठी बालसदनमध्ये आम्ही ठेवले आहे. परंतु त्याच्या वडिलांना हस्तांतरित करण्याचे अधिकार केवळ बालकल्याण समितीला आहे. नागपुरात बालकल्याण समितीच नसल्याने आम्ही हतबल ठरतो आहे. आम्हीही बालकल्याण समितीची वाट बघतो आहे, बालकल्याण समितीशिवाय रियाजला त्याच्या वडिलांच्या सुपूर्द करता येणार नाही. - मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी