काेंढाळी : वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी-अमरावती महामार्गावरील खापरी (बाराेकर) शिवारात शनिवारी (दि.११) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
गाेविंद रघुनाथ वरठी (वय ४२, रा. कलमुंडा, ता. काटाेल) व त्यांचा मुलगा यश गाेविंद वरठी (१७) अशी जखमींची नावे आहेत. गाेविंद वरठी हे मुलासाेबत एमएच-४०/बीएस-३१५९ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजा (घाडगे) येथे भाजी विकण्यासाठी जात हाेते. दरम्यान, खापरी (बाराेकर) शिवारात अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे दुचाकी अनियंत्रित हाेऊन रस्त्यावर काेसळली. यात गाेविंद वरठी व यश हे दाेघेही गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताबाबत समजताच काेंढाळी येथील रुग्णवाहिका चालक संजय गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार भाेजराज तांदूळकर करीत आहेत.