शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरातील मनोरुग्णांनी शोधला शेतीत सृजनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 11:09 IST

नागपूरच्या प्रादेशिक मनोरु ग्णालयातील ३० ते ४० रुग्णांनी भाजीपाल्याची शेती उभी केली आहे तर केळी व पपईची फळबाग फुलविली आहे.

ठळक मुद्देरुग्णालय परिसरात फुलवली केळीची बाग प्रादेशिक मनोरुग्णालयाचा अनोखा उपक्रम

सुमेध वाघमारे।आॅनलाईन लोकमतनागपूर : परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शीच मानसिक संघर्ष सुरू आहे. त्यांच्या उपचारात हातभार लागावा म्हणून त्यांना आवडेल ते काम करू देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. यातच अनेक रुग्ण हे शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेती यांच्याशी जोडले तर ते लवकर बरे होतात. याच अनुभवावर गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या थोडाशा मेहनतीवर तब्बल पाच एकरची शेती फुलत आहे. या जीवांना थोडे समाधान, सृजनाचा आनंद मिळत आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरु ग्णालयातील हे चित्र.औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करण्याला शासन आणि समाजाला यश लाभत नसल्याचे चित्र वेळोवेळी सामोर येत असले तरी, प्रादेशिक मनोरुग्णालय त्यांच्याकडे आहे त्या सोयीत रुग्णांवर कसा प्रभावी उपचार करता येईल याकडे सतत लक्ष देत आले आहे. या रुग्णालयाची क्षमता ९४० रु ग्णांची आहे. सद्यस्थितीत पुरु ष व महिला मनोरुग्ण मिळून ६००वर रुग्ण दाखल आहेत. हे रुग्णालय असले तरी एक कुटुंब म्हणून येथे सर्वच जण वावरतात. येथे उपचारासोबतच डॉक्टर, काही परिचारिका आणि परिचरांकडून मिळत असलेल्या मायेच्या ओलाव्यामुळे अनेक रुग्ण दैनंदिन काम करू शकतात. अशा रुग्णांना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात शेतीचे काम हाही एक प्रशिक्षणाचा भाग आहे. याच प्रशिक्षणाच्या मदतीने ३० ते ४० रुग्णांनी भाजीपाल्याची शेती उभी केली आहे तर टाटा ट्रस्टच्या मदतीने मिळालेल्या केळी व पपईच्या रोपामुळे फळबाग फुलविली आहे.५०० पपईची तर १००० केळीची झाडेरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.एस. फारुखी यांनी सागितले, तीन वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या १० एकर परिसरात शेती व फळबाग रुग्णांच्या मदतीने केली जायची. परंतु गेल्या तीन-साडेतीन वर्षांत हा उपक्रमच बंद पडला. रुग्णांच्या हितासाठी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा उपक्रम पुन्हा हाती घेण्यात आला. साधारण पाच एकर जागा शेती व फळबागेसाठी राखीव ठेवण्यात आली. यातील दोन एकर जागेवर भाजीपाला तर उर्वरित तीन एकर परिसरात ५०० पपईची झाडे व १००० केळीची झाडे लावली. शेती व फळबागेचा सांभाळ करण्यासाठी रुग्णालयाचे स्वत:चे माळी आहेत. हे माळी शेतीची आवड असणाऱ्यांना रुग्णांना निंदण, वखरणापासून तर भाजीपाल्याचे रोप टाकण्यापर्यंतचे प्रशिक्षण देतात.

कामात रमणे हेच औषधमनोरु ग्णालयामध्ये वर्षांनुवर्षे राहणारे रुग्ण आहेत. त्यांच्यावर मनोरु ग्ण असा शिक्का बसल्याने फार कमी नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जातात. यामुळे उर्वरित बरे झालेल्या रुग्णांना शेतीसह इतरही विविध २० प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असतो. या प्रशिक्षणात ते रमतात, खेळतात. हेच त्यांच्यावरचे खरे औषध आहे.-डॉ. आर.एस.फारुखीवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरु ग्णालय

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालय