शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

शेतकऱ्यांची होणार पीकस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी ...

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा, राज्य व विभागस्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे यांनी दिली. कृषी विभागाकडून नागपूर जिल्ह्यात रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पीक स्पर्धाचे निकष बदलण्यात आले आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य पिकांच्या जिल्हांतर्गत पीक स्पर्धेचे आधीचे नियम, वेळापत्रक आणि बक्षीस रक्कम देखील बदलण्यात आलेली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून नव्या निकषाची अंमलबजावणी होईल. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.

ज्वारी, गहू, हरबरा, जवस, तूर अशा पाच पिकासाठी रबी पीकस्पर्धा होईल. यासाठी शेतकऱ्यांना किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान १००० हेक्टर असणे गरजेचे आहे.

तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटात ५ कमीत कमी अर्ज येणे आवश्यक आहे. संबंधित गावात त्यासाठी पीक कापणी समिती नेमली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा १.५ पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येईल. त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी सर्व पातळीवरील पीकस्पर्धा पुरस्करासाठी अपात्र समजण्यात येतील.

गावपातळीवर पीक कापणी समिती

पीककापणी समितीत पर्यवेक्षक अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहायक ( सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश राहणार आहे.

असे आहेत पुरस्कार

राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घोषित करेल. जिल्हा स्तरावर पहिला पुरस्कार १० हजार रुपये, दुसरा ७ हजार तर तिसरा पुरस्कार ५ हजार रुपये रोख असा आहे. विभागीय स्तरावर पहिला पुरस्कार २५ हजार, दुसरा २० हजार तर तिसरा पुरस्कार १५ हजार रुपयांचा असेल. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे संबंधित स्पर्धेसाठी अर्ज करावयाचा आहे. ३०० रुपये स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.