शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

बोंडअळीमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 11:10 IST

यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले.

ठळक मुद्देकपाशीचे पीक गेले वाया शासनाकडे सर्वांचे लक्ष

नितीन नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले. यावर्षी सांगितल्याप्रमाणे व वेळोवेळी पाऊस न आल्याने बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सोयाबीनचे उभे पीक नांगरावे लागले. या सर्व संकटाना समोर जात असताना आणखीन एक संकट बळीराजासमोर उभे ठाकले आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे कृषी विभागामार्फत बोंडअळी आल्याबाबतची पाहणी करण्यात आली.यावेळी कृषी विभागाकडून अमित वानखडे कृषी सहायक यांनी नरखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन बोंडअळीची पाहणी केली. तर त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले की बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावेळी त्यांनी उपाययोजना म्हणून फवारणी ही योग्य पद्धतीने व वेळेवर झाल्यास यावर नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.जलालखेडा येथील सुरेश बारापात्रे यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता असे आढळून आले की जवळपास सर्वच आठ एकर शेतातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिवाळीअगोदर मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

आठ एकर शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्यामुळे कपाशीला पाणी देऊन त्याला जगवले. वेळोवेळी फवारणीसुद्धा केली आता कपाशीला जवळपास ६० ते ७० बोंड आहेत. परंतु सर्वच बोंडामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे मोठे संकट समोर उभे ठाकले आहे.सुरेश बारापात्रे, शेतकरी जलालखेडा

मागील वर्षीसुद्धा आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या वर्षी याची पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून कमीत कमी तीन दिवसात स्पिनोस्यड ४५ ची फवारणी करावी.अमित वानखडे, कृषी सहायक, भारसिंगी

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस