शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

बोंडअळीमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 11:10 IST

यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले.

ठळक मुद्देकपाशीचे पीक गेले वाया शासनाकडे सर्वांचे लक्ष

नितीन नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले. यावर्षी सांगितल्याप्रमाणे व वेळोवेळी पाऊस न आल्याने बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सोयाबीनचे उभे पीक नांगरावे लागले. या सर्व संकटाना समोर जात असताना आणखीन एक संकट बळीराजासमोर उभे ठाकले आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे कृषी विभागामार्फत बोंडअळी आल्याबाबतची पाहणी करण्यात आली.यावेळी कृषी विभागाकडून अमित वानखडे कृषी सहायक यांनी नरखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन बोंडअळीची पाहणी केली. तर त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले की बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावेळी त्यांनी उपाययोजना म्हणून फवारणी ही योग्य पद्धतीने व वेळेवर झाल्यास यावर नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.जलालखेडा येथील सुरेश बारापात्रे यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता असे आढळून आले की जवळपास सर्वच आठ एकर शेतातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिवाळीअगोदर मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

आठ एकर शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्यामुळे कपाशीला पाणी देऊन त्याला जगवले. वेळोवेळी फवारणीसुद्धा केली आता कपाशीला जवळपास ६० ते ७० बोंड आहेत. परंतु सर्वच बोंडामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे मोठे संकट समोर उभे ठाकले आहे.सुरेश बारापात्रे, शेतकरी जलालखेडा

मागील वर्षीसुद्धा आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या वर्षी याची पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून कमीत कमी तीन दिवसात स्पिनोस्यड ४५ ची फवारणी करावी.अमित वानखडे, कृषी सहायक, भारसिंगी

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस