शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

गोवंश हत्याबंदीने थांबतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 17, 2015 03:00 IST

राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे.

नागपूर : राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे. जैन संत आचार्य श्री गिरनारसागर महाराज यांच्या सानिध्यात आणि गोवंश उपयोगिकीकरण संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुमत लल्ला जैन यांनी सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायदा नागरिकांच्या हिताचा आहे. याबाबत कायदा तयार झाल्यानंतर काही दिवसाने काही राजकीय नेते आणि संघटना याचा विरोध करीत आहेत.राजकीय नेते केवळ राजकीय फायद्यासाठी वक्तव्य करून आंदोलनाचा इशारा देत आहेत. गोवंशाच्या सातत्याने होत असलेल्या हत्येमुळे हा पशु अतिशय वेगाने नष्ट होत आहे. गोवंशाची हत्या हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील एक कारण आहे. गावात गाईचे दूध आणि दूधाच्या उत्पादनांची खूप कमतरता आहे. गोवंश वाढल्यामुळे काही वर्षापूर्वी चर्म उद्योग चांगला सुरू होता. कारण गावात नैसर्गिकरीत्या मृत्यू होणाऱ्या गार्इंचे चामडे चर्मकारी काढत होते. यामुळे चर्मकारांना रोजगार मिळुन चर्मोद्योग चांगला सुरू होता. परंतु कत्तलखान्याच्या मोठ्या मागणीमुळे गोवंश वेगाने नष्ट केल्या जाऊ लागला. भाकड होण्यापूर्वीच गार्इंची हत्या होऊ लागली. गोवंशाचा मृत्यू गावात न झाल्यामुळे गिधाडांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे जनतेने या कायद्याबाबत भ्रमात न पडता या कायद्याचा आदर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत संस्थेचे कोषाध्यक्ष सुुरेश आग्रेकर, रवीन्द्र आग्रेकर, जैन सेवा मंडळाचे मंत्री सतीश पेंढारी, हिराचंद मिश्रिकोटकर, विजय सोईतकर, गिरीश हनुमंते उपस्थित होते.(प्रतिनिधी)