शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उपराजधानीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर वाटली सडकी संत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:06 IST

परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून देण्याबाबत सरकार काहीच हालचाल करत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी चौक परिसरात रस्त्यावर संत्री फुकट वाटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर: परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून देण्याबाबत सरकार काहीच हालचाल करत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी चौक परिसरात रस्त्यावर संत्री फुकट वाटली. झालेल्या नुकसानाची पाहणी करून योग्य ती भरपाई द्यावी यासाठी शेकडो शेतकरी येथे हजर झाले होते. सडका शेतमाल भेट आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सडकी संत्री  रस्त्यावर वाटली. आधी अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, मका ही पिके सडली आहेत. मोसंबी व संत्रा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने याचे सर्वेक्षण  व पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. आंदोलनाला पोलिसांचे गालबोटउपराजधानीत आयोजित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुधवारी सकाळी पोलिसांनी अडवल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करावी शेतकºयांना भरपाई मिळावी या हेतूने निवेदन देण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीचे प्रमुख राम नेवले हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले असताना ही घटना घडली.सकाळी ११.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकात आंदोलनाचे कार्यकर्ते पोहचले असता, पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झटापट झाल्याचेही वृत्त आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

टॅग्स :Farmerशेतकरी