शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शेतकऱ्यांनी थांबविल्या पेरण्या : २२,००० क्विंटल बियाण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:04 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाहीर केले आहे. सदर वाण शेतकऱ्यांना अनुदानावर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या थांबविल्या आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना बाजारातून विविध कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसोयाबीन शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाहीर केले आहे. सदर वाण शेतकऱ्यांना अनुदानावर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या थांबविल्या आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना बाजारातून विविध कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे.मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीस इच्छुक आहे. गेल्यावर्षी कापसावर बोंडअळीचा झालेला परिणाम यामुळे शेतकऱ्यांचा यावर्षी सोयाबीनकडे कल आहे. कृषी विभागाच्या नियोजनात सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यावर्षी सोयाबीन एक लाख हेक्टरवर पेरण्यात येईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या अनुदानावर मिळणाऱ्या वाणाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात १४ हजार क्विंटल सोयाबीनच्या वाणाला अनुदान देण्यात आले होते. यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला असतानाही केवळ २२७० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्यात आले आहे. महाबीजच्या ९५३० या वाणासाठी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते. यात केंद्राचे ६० आणि राज्याचा वाटा ४० टक्के असतो. परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने आपला वाटा दिला नसल्याने कृषी विभागाने अनुदान जाहीर केले नाही. जिल्ह्यात किमान २२ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यानी अनुदानाच्या प्रतीक्षेत पेरण्या थांबविल्या आहेत.शेतकऱ्यांची भटकंती, बियाण्यांच्या दुकानावर फलकग्रामीण भागातील बियाण्यांच्या दुकानावर अनुदानित बियाणे उपलब्ध नाही, असे फलक लावलेले आहेत. अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. महाबीजने बियाणे बाजारात उपबल्ध केले आहे. परंतु शासनाकडून अनुदानासंदर्भात कुठलेही पत्र नसल्यामुळे अनुदानावर बियाण्यांची विक्री थांबविली आहे. डीपीसीतून द्यावे अनुदानसोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेता, सरकारकडून अद्यापही अनुदानासाठी पत्र आलेले नाही. अशात पेरण्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे डीपीसीतून अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी जि.प. सदस्य व कृषी समितीचे सदस्य मनोज तितरमारे यांनी केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना अनुदानाची गरजविदर्भात कॅश क्रॉप म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे. गेल्यावर्षी कापसावर आलेल्या रोगामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन