शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 11:04 IST

शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.

ठळक मुद्देकिसान अधिकार यात्रेचे स्वागतशेतकरी नेत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन ते आत्महत्येकडे वळले. शेतकऱ्यांना या कर्जातून बाहेर काढून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखीनच वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई असून, शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.काश्मीर ते कन्याकुमारी किसान अधिकार यात्रेचे गुरुवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकात आगमन झाले. यात्रेत सहभागी विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार, काश्मीरचे शेतकरी नेते हमीद मलिक, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार शर्मा, यात्रेचे समन्वयक अभिमन्यू कोहाड, हरियाणाचे गुरुनाम चंडोणी, पंजाबचे जगजितसिंह दल्लेवाल, उत्तर प्रदेशचे हरपालसिंह, राजस्थानचे सतबीरसिंह, केरळचे ए. बी. बिजू, कर्नाटकचे शांताकुमारजी, छत्तीसगडचे राजकुमार गुप्ता उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले यांनी उद्योगपतींकडून टॅक्स वसूल करून तो गरिबांचे आरोग्य, शिक्षणासाठी वापरण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. परंतु भाजप सरकार गरिबांकडून वसूल करून उद्योगपतींच्या घशात पैसे ओतत असल्याचा आरोप केला. इंग्लंडप्रमाणे शासनाने शेतीत ८५ टक्के भागीदारी करण्याची मागणी करून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आमदार बच्चू कडू यांनी भारताला बदलविण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा भगतसिंग यांच्या मार्गावर जाऊन किसान संघटनेचे किसान सैन्यात रूपांतर करण्याची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. अभिमन्यू कोहाळ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून शासनाकडून त्या झालेल्या हत्या असल्याचा उल्लेख केला. हमीद मलिक यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असल्याचे सांगितले. गुरुनाथसिंग चंदुरी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे १५ दिवसाचे वेतन आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई सारखी असल्याचे सांगून यामुळेच आत्महत्या वाढल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खोत यांनी शासनाची धोकेबाजी उघड करण्यासाठी ही यात्रा काढल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार शर्मा यांनी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन अक्षता दमने यांनी केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन श्रीकांत तराळ यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी