शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 11:04 IST

शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.

ठळक मुद्देकिसान अधिकार यात्रेचे स्वागतशेतकरी नेत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन ते आत्महत्येकडे वळले. शेतकऱ्यांना या कर्जातून बाहेर काढून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखीनच वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई असून, शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.काश्मीर ते कन्याकुमारी किसान अधिकार यात्रेचे गुरुवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकात आगमन झाले. यात्रेत सहभागी विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार, काश्मीरचे शेतकरी नेते हमीद मलिक, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार शर्मा, यात्रेचे समन्वयक अभिमन्यू कोहाड, हरियाणाचे गुरुनाम चंडोणी, पंजाबचे जगजितसिंह दल्लेवाल, उत्तर प्रदेशचे हरपालसिंह, राजस्थानचे सतबीरसिंह, केरळचे ए. बी. बिजू, कर्नाटकचे शांताकुमारजी, छत्तीसगडचे राजकुमार गुप्ता उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले यांनी उद्योगपतींकडून टॅक्स वसूल करून तो गरिबांचे आरोग्य, शिक्षणासाठी वापरण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. परंतु भाजप सरकार गरिबांकडून वसूल करून उद्योगपतींच्या घशात पैसे ओतत असल्याचा आरोप केला. इंग्लंडप्रमाणे शासनाने शेतीत ८५ टक्के भागीदारी करण्याची मागणी करून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आमदार बच्चू कडू यांनी भारताला बदलविण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा भगतसिंग यांच्या मार्गावर जाऊन किसान संघटनेचे किसान सैन्यात रूपांतर करण्याची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. अभिमन्यू कोहाळ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून शासनाकडून त्या झालेल्या हत्या असल्याचा उल्लेख केला. हमीद मलिक यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असल्याचे सांगितले. गुरुनाथसिंग चंदुरी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे १५ दिवसाचे वेतन आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई सारखी असल्याचे सांगून यामुळेच आत्महत्या वाढल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खोत यांनी शासनाची धोकेबाजी उघड करण्यासाठी ही यात्रा काढल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार शर्मा यांनी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन अक्षता दमने यांनी केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन श्रीकांत तराळ यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी