शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकऱ्यांनीच क्रांतीची मशाल हातात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 11:04 IST

शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.

ठळक मुद्देकिसान अधिकार यात्रेचे स्वागतशेतकरी नेत्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४५ वर्षांत काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन ते आत्महत्येकडे वळले. शेतकऱ्यांना या कर्जातून बाहेर काढून अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानेही शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकरी आत्महत्या आणखीनच वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई असून, शेतकऱ्यांनी क्रांतीची मशाल हाती घेण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेत्यांनी केले.काश्मीर ते कन्याकुमारी किसान अधिकार यात्रेचे गुरुवारी दुपारी ३ वाजता संविधान चौकात आगमन झाले. यात्रेत सहभागी विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, जय जवान जय किसान संघटनेचे संयोजक प्रशांत पवार, काश्मीरचे शेतकरी नेते हमीद मलिक, मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार शर्मा, यात्रेचे समन्वयक अभिमन्यू कोहाड, हरियाणाचे गुरुनाम चंडोणी, पंजाबचे जगजितसिंह दल्लेवाल, उत्तर प्रदेशचे हरपालसिंह, राजस्थानचे सतबीरसिंह, केरळचे ए. बी. बिजू, कर्नाटकचे शांताकुमारजी, छत्तीसगडचे राजकुमार गुप्ता उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले यांनी उद्योगपतींकडून टॅक्स वसूल करून तो गरिबांचे आरोग्य, शिक्षणासाठी वापरण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. परंतु भाजप सरकार गरिबांकडून वसूल करून उद्योगपतींच्या घशात पैसे ओतत असल्याचा आरोप केला. इंग्लंडप्रमाणे शासनाने शेतीत ८५ टक्के भागीदारी करण्याची मागणी करून आगामी निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ईव्हीएम मशीनविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आमदार बच्चू कडू यांनी भारताला बदलविण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा भगतसिंग यांच्या मार्गावर जाऊन किसान संघटनेचे किसान सैन्यात रूपांतर करण्याची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले. अभिमन्यू कोहाळ यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून शासनाकडून त्या झालेल्या हत्या असल्याचा उल्लेख केला. हमीद मलिक यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असल्याचे सांगितले. गुरुनाथसिंग चंदुरी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे १५ दिवसाचे वेतन आणि शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई सारखी असल्याचे सांगून यामुळेच आत्महत्या वाढल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खोत यांनी शासनाची धोकेबाजी उघड करण्यासाठी ही यात्रा काढल्याचे स्पष्ट केले. शिवकुमार शर्मा यांनी पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन अक्षता दमने यांनी केले. प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन श्रीकांत तराळ यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी