शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:40 IST

शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे कापूस मेळावा २०१९

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले.भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘कापूस मेळावा २०१९’ मध्ये ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर, कृषी विभागाचे सह संचालक रविंद्र भोसले, कापुस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह, केंद्रीय कापुस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरो उपस्थित होते. डॉ. शरणागौडा पाटील यांनी भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असून त्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आर. पी. सिंह यांनी जैविक शेतीचे महत्व सांगून सरकारच्या कृषी योजनांची माहिती दिली. रविंद्र भोसले यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. डॉ. एम. एस. कैरो यांनी खेड्यात शेती विषयक लघु उद्योगाचा विस्तार होण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. शरद निंबाळकर यांनी बी. टी. बियाण्याचा वापर लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात संस्थेने प्रकाशित केलेल्या माहितीपत्रक, स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादनांचे तंत्रज्ञान, गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, किडनाशकांचा सुरक्षित वापर, कपाशीवरील रोगांचे व्यवस्थापन आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी केंद्रीय कापुस संशोधन केंद्राने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे मेळाव्याचे उद्दिष्ट असल्याचे मत व्यक्त केले. आभार डॉ. एस. एम. वासनिक यांनी मानले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी