शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शेतकरी संघटना तिसरा राजकीय पर्याय उभा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:11 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी समस्यांमध्ये खितपत पडला आहे. सत्ताधाऱ्यांसोबतच कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेदेखील शेतकऱ्यांच्या समस्यांचे भांडवलच केले असून स्वत:च्या स्वार्थासाठीच उपयोग केला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच तिसरा राजकीय पर्याय उभा करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले.

ठळक मुद्देरघुनाथ पाटील : कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शेतकरी समस्यांचे भांडवल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी समस्यांमध्ये खितपत पडला आहे. सत्ताधाऱ्यांसोबतच कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेदेखील शेतकऱ्यांच्या समस्यांचे भांडवलच केले असून स्वत:च्या स्वार्थासाठीच उपयोग केला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच तिसरा राजकीय पर्याय उभा करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले. राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या या सरकारी हत्या आहेत. त्यामुळे सरकारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली. राज्यातील ४० शेतकरी संघटनांची सुकाणू समितीतर्फे आयोजित महाराष्ट्रव्यापी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा सोमवारी नागपुरात पोहोचली. यावेळी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.सुकाणू समितीची हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा आज नागपुरात पोहोचली. या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी ही माहिती दिली. या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या १४ मे रोजी सुकाणू समितीच्या वतीने राज्यभर जेलभरो आंदोलन करणार, अशी घोषणाही त्यांनी येथे केली.भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येण्याची भाषा करते. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडूनदेखील शेतकऱ्यांचा पुळका आल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात हे तिन्ही पक्ष मिळून विधीमंडळात एकत्र येऊन सरकारला शेतकरी समस्या दुर करण्यासाठी बाध्य करु शकतात. मात्र कुणाकडूनही पाऊल उचलण्यता येत नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार गेले व त्यांची शेतकरीविरोधी धोरणे आता भाजप-सेनेचे सरकार राबवत आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी किशोर ढमाले, प्रशांत पवार, दिनकर दाभाड, गणेश जगताप आणि कालिदास अपेट प्रामुख्याने उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून २३ मार्च रोजी निघालेली शेतकरी यात्रा १६ जिल्ह्यांचे भ्रमण करून सोमवारी नागपुरात दाखल झाली. ही यात्रा आणखी २२ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे.सरकारपेक्षा मटक्याचे आकडे विश्वासार्हशेतमालाला योग्य भाव देण्यात यावे व सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी सुकाणू समितीतर्फे १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. सरकार वारंवार कर्जमाफीबाबत वेगवेगळी माहिती देत आहे. सरकारच्या आकडेवारीपेक्षा तर मटक्याचे आकडे जास्त विश्वासार्ह आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उद्योगांना पूरक असे धोरण आखले होते. नेहरूंच्या याच धोरणांमुळेच शेतीचा सत्यानाश झाला. त्यानंतर प्रत्येक सरकारने तीच धोरणे राबविली असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन