शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरातच साठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:44 IST

भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणाऱ्या भावात उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील हजारो क्विंटल कापूस घरीच साठवून ठेवला आहे.

ठळक मुद्देदरवाढीची प्रतीक्षाउत्पादन खर्च भरून निघण्याची शक्यता मावळली

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणाऱ्या भावात उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील हजारो क्विंटल कापूस घरीच साठवून ठेवला आहे. विशेष म्हणजे, भिवापूर व उमरेड तालुक्यात खासगी जिनिंग व प्रेसिंग नसून, शासकीय खरेदी केंद्रदेखील नाही.यावर्षी कापसाची खरेदी प्रति क्विंटल ४,५०० रुपयांपासून सुरू झाली होती. मध्यंतरी हा दर प्रति क्विंटल ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली. सध्या उमरेड आणि हिंगणघाट (जिल्हा वर्धा) बाजारपेठेत ५,००० रुपये ते ५,१०० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी सुरू आहे. हा दर परवडण्याजोगा नसल्याने त्यातून कापसाचा उत्पादन खर्च भरून निघणे शक्य नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

उत्पादन खर्चात वाढकपाशीचे पीक सहा ते आठ महिने शेतात राहात असल्याने त्या शेतात कपाशीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेता येत नाही. या हंगामात सुरुवातीला कपाशीचे पीक जोमदार होते. शेतकऱ्यांनी कापसाचा पहिला वेचा घेतल्यानंतर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या नानाविध कीटकनाशकांची फवारणी केली. परंतु, फारसा उपयोग झाला नाही. शिवाय, यावर्षी कापूस वेचणीची मजुरी प्रति किलो १० रुपये होती. मागील वर्षी शेतकऱ्यांनी सात ते साडेसात रुपये प्रति किलो कापसाची वेचणी केली होती. महागडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच शेत तयार करण्यापासून तर कापूस वेचणीपर्यंतचा संपूर्ण खर्च विचारात घेता यावर्षी कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत कापसाला मिळाणारा बाजारभाव हा कमी आहे.

शासकीय खरेदी नाहीराज्यात शासनाच्यावतीने सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) आणि कापूस एकाधिकार योजनेंतर्गत कापूस खरेदी केली जाते. त्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले जाते. मात्र, उमरेड व भिवापूर तालुक्यात केंद्र शासनाच्या सीसीआय आणि राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेंतर्गत कधीच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव उमरेड किंवा हिंगणघाट बाजारपेठेत कापूस न्यावा लागतो.

बाजारपेठेची वानवाउमरेड व भिवापूर तालुक्यात कपाशीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत असले तरी या भागात कापसाची हक्काची बाजारपेठ नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना उमरेड किंवा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजारपेठेत कापूस विकायला न्यावा लागतो. नांद परिसरातून हिंगणघाट हे ६५ कि.मी आणि उमरेड हे २५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही सोसावा लागतो. शिवाय, या दोन्ही तालुक्यांमध्ये खासगी जिनिंग व पे्रसिंग नाहीत.

अपुऱ्या जागेमुळे शेतकरी अडचणीतनांद व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत त्यांच्याकडील कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसामुळे या शेतकऱ्यांच्या घरी साधे निवांत बसण्यासाठीही पुरेसी जागा शिल्लक राहिली नाही. काहींना तर कापसाच्या ढिगावर झोपावे लागते तर काहींना घराच्या बाहेर कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागते. दुसरीकडे या कापसाची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे.

फडतर कापसाचा भावयावर्षी कपाशीच्या बीटी वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी व पांढऱ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. वास्तवात या कापसाचा दर्जा चांगला आहे. शेतकरी हाच कापूस बाजारात विक्रीला नेतो, तेव्हा व्यापारी त्यांच्या चांगल्या कापसाला फडतर कापसाचा भाव देतात. एकदा कापूस बाजारपेठेत नेल्यानंतर भाव न परवडल्यास तो बाजारातून घरी परत आणणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. या प्रकारात होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट बघणे लोकप्रतिनिधी पसंत करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस